सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप करणारा एक मेसेज शेअर केला आहे. ग्रामपंचायतीच्या गटनेत्याने तानाजी सावंत यांच्या माणसांनी आपल्याला मारहाण केल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
“ताई मी रत्नदीप शिवाजी चव्हाण बोलत आहे. मी वाल्हा सामनगाव ग्रामपंचायतचा गटनेता आहे. ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आल्यापासून आमदार तानाजी सावंत यांचे लोक, तसेच तालुका कृषी सभापती यांनी काल मला अमानुषपणे मारहाण केली. ताई मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. मी खूप दहशतीत आहे. माझे प्राण वाचवा. माझ्या विरोधात तक्रारही घेत नाहीत. पोलीस स्टेशनचे लोक त्यांना स्वतःच्या दबावपोटी एफआयआर घेत नाहीत. भूम तालुका पोलीस स्टेशन जिल्हा धाराशिव. ताई माझे प्राण वाचवा मी खूप दहशतीत आहे”, असा मेसेज अंजली दमानिया यांना पाठवण्यात आला आहे.
रत्नदीप चव्हाण यांनी तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपांवर तानाजी सावंत यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिली जाते? ते पाहणं महत्त्वाचं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून काही दखल घेतली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

