Amravati Student Food Poisoning: टेंभली येथून तयार होणारे अन्न बिजुधावडी, सुसर्दा, सावलीखेडा, खारी, कुटंगा, चिखली, टिटंबा ते राणीगावसारख्या सुमारे ५० किलोमीटरपर्यंतच्या आश्रमशाळांमध्ये पोहोचविले जाते. हा तपासाचा प्रमुख मुद्दा ठरला आहे.
सलग दोन दिवस घडलेल्या घटनांनंतर प्रशासनाने कठोर पावले उचलत टेंभली येथील ‘सेंट्रल किचन’ तात्पुरते बंद केले आहे. यासोबतच किचनचे मालक विजय सदाशिव बोथरे (पुणे), प्रतिनिधी सचिन किसन सातपुते, स्वयंपाकी संदिपसिंग, कर्मचारी महेश देसाई, आमेकर व अन्य एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Rain: सिंहस्थ कामांची पोलखोल! गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर पितळ उघड; राज्यपाल आज घेणार आढावा
टिटंबा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत २५ जुलै रोजी रात्रीच्या जेवणानंतर प्रथम विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब आणि अस्वस्थतेची लक्षणे दिसून आली. त्यानंतर रविवारी बिजुधावडी, सावलीखेडा आणि सुसर्दा येथील आश्रमशाळांमध्येही अशाच प्रकारच्या घटना घडल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, अद्याप धारणी उपजिल्हा रुग्णालयात ६९ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.
या घटनांमुळे पालक आणि मेळघाटातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, शनिवारी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि रविवारी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके मेळघाट दौऱ्यावर असतानाच या घटना घडल्याने प्रशासनाच्या यंत्रणेवर अधिकच टीका होत आहे. मंत्री उईके यांच्या निर्देशानंतरच किचनविरोधातील कारवाईला वेग आल्याचे सांगितले जात आहे. धारणी पोलिसांनी टिटंबा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक निलेश भागवत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. अन्नाचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करण्यात आले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.
पूर्वी प्रत्येक आश्रमशाळेत स्वतंत्रपणे स्वयंपाक तयार केला जात होता. निकृष्ट दर्जाचे अन्न, स्थानिक पातळीवरील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींनंतर आदिवासी विकास विभागाने ‘सेंट्रल किचन’ ही संकल्पना राबविली.
Nashik MHADA Scam: नाशिक महापालिकेचा दणका! म्हाडा घोटाळ्यातील 42 लेआउट रद्द, सामान्यांची घरेही कचाट्यात, प्रकरण काय?
आदिवासी विकासमंत्र्यांना घेराव
टिटंबा येथील पहिल्या घटनेनंतर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी टेंभली येथील सेंट्रल किचनची पाहणी केली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालत संबंधितांवर फौजदारी कारवाई आणि सेंट्रल किचन बंद करण्याची मागणी केली. संतप्त नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
