• Wed. Mar 11th, 2026

    Nandurbar News : नवस फेडण्यासाठी जात असलेल्या 10 वर्षीय बालिकेला कुटुंबीयांसमोर बिबट्याने फरपटत नेले

    Nandurbar News : नवस फेडण्यासाठी जात असलेल्या 10 वर्षीय बालिकेला कुटुंबीयांसमोर बिबट्याने फरपटत नेले

    दीपमाला आपल्या कुटुंबासोबत शेतात नवस फेडण्यासाठी जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घातली. तिला मक्याच्या शेतात फरफटत नेले. कुटुंबीयांनी आरडाओरड करत पाठलाग केला, मात्र बिबट्याने तिला ओढत नेले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    महेश पाटील, नंदुरबार : कुटुंबासमवेत शेतात नवस फेडण्यासाठी जात असलेल्या दहा वर्षीय बालिकेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घालत तिला मक्याच्या शेतात फरफटत नेले. कुटुंबीयांनी आरडाओरड करत पाठलाग केला, मात्र बिबट्याने तिला ओढत नेले. सुमारे एक तास शोध घेतल्यानंतर दीपमाला मयत अवस्थेत आढळली. ही घटना 16 मार्चला सकाळी घडली. दरम्यान 10 किलोमीटरच्या परिसरात 24 तासात बिबट्याने दोघांचा बळी घेतला आहे. तर वर्षभरात 8 बळी घेतले आहेत. नरभक्षक बिबट्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

    तळोदा तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता गणेश बुधावल शिवारात ४७ वर्षीय ललिताबाई अशोक पाडवी यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेला अवघे २४ तास उलटले नाहीत तोच रविवारी सकाळी सरदार नगर शिवारात १० वर्षीय दीपमाला नर्सिंग तडवी हिला बिबट्याने ठार मारले.
    Sangli News : चंद्रकांत पाटील यांची खासदार विशाल पाटील यांना खुली ऑफर, काँग्रेसचे निष्ठावंत भाजपमध्ये जाणार?
    दीपमाला आपल्या कुटुंबासोबत शेतात नवस फेडण्यासाठी जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घातली. तिला मक्याच्या शेतात फरफटत नेले. कुटुंबीयांनी आरडाओरड करत पाठलाग केला, मात्र बिबट्याने तिला ओढत नेले. सुमारे एक तास शोध घेतल्यानंतर दीपमाला मयत अवस्थेत आढळली. या सलग दोन घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वन विभाग आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू आहे. ग्रामस्थांनी तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करत प्रशासनाला इशारा दिला आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    वर्षभरात बिबट्याच्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू

    तळोदा शहरातील दहा किलोमीटरच्या परिघात वर्षभरात बिबट्याने विविध हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत. या परिसरात वन विभागाने ठोस कारवाई करावी. परिसर बिबट्यामुक्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

    महेश पाटील

    लेखकाबद्दलमहेश पाटीलमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये नंदुरबार प्रतिनिधी म्हणून कार्यरत. 2003 ते 2014 दरम्यान विविध वृत्तपत्रात फोटोग्राफर म्हणून सुरुवात. त्यानंतर विविध वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून प्रवास करीत मटा ऑनलाईन पर्यंत वाटचाल.राजकीय बातम्यांमध्ये विशेष हातखंडा, विशेष स्टोरी शोधण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed