• Thu. Sep 10th, 2026
औरंगजेब जेवढा क्रूर वागत होता त्याच पद्धतीने फडणवीस सरकार वागत आहे : हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Mar 2025, 6:38 pm

औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर काढून टाकावी, अन्यथा बाबरी….ढाच्याप्रमाणे कारसेवा करून ही कबर उदध्वस्त करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद…आणि बजरंग दलाच्या वतीने शनिवारी देण्यात आला. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे.यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज…यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे. विश्व हिंदु परीषद आणि बजरंग दल यांनी स्टंट करू नये. औरंगजेब जेवढा क्रूर होता तेवढ्याच क्रूर पणे महाराष्ट्रात फडणवीस सरकार वागत आहे.घाशीराम कोतवाल प्रमाणे गृहविभाग चालतोय का असा प्रश्न पडतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *