• Thu. Mar 12th, 2026
    औरंगजेबाच्या कबरी हटवा, विहिंप-बजरंग दलाची शिवजयंतीला राज्यभर मोहीम

    Chhatrapati Sambhaji Maharaj : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर औरंगयाची कबर खणून काढावी व त्याचे कुठलेही अस्तित्व राहू देवू नये. अन्यथा बजरंग दल चलो संभाजीनगर… व छत्रपती संभाजी महाराज के सन्मान में बजरंग दल मैदान मे… हा नारा देत कारसेवा करेल, असा इशारा देण्यात आला

    महाराष्ट्र टाइम्स

    विजयसिंह होलम, अहिल्यानगर : औरंगजेबाच्या राज्यभरातील कबरी (Aurangzeb Tomb) तातडीने हटवण्याची मागणी बजरंग दलाने केली आहे. यासंदर्भात तिथीनुसार येणाऱ्या शिवयजयंतीच्या दिवशी सोमवारी (१७ मार्च) राज्यभर मोहीम सुरू करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) के सन्मान में बजरंग दल मैदान मे… क्रूरकर्मा धर्मद्वेषी औरंग्याची कबर हटाव मोहीम विहिंप व बजरंग दलाने हाती घेतली असून, यासाठी आंदोलने केली जाणार आहेत.

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. त्याचा मृत्यू नगरच्या भिंगारजवळील आलमगीर येथे झाला आहे. आलमगीर येथेही त्याचे स्मृतीस्थळ आहे. त्यामुळे खुलताबाद येथील कबर काढण्यासह आलमगीर येथील स्मृतीस्थळही काढण्याची विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची मागणी आहे. याशिवाय राज्यभरात जेथे औरंगजेबाची स्मृतीस्थळे असतील, तेथून ती काढण्याचीही मागणी आहे. यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर औरंगयाची कबर खणून काढावी व त्याचे कुठलेही अस्तित्व राहू देवू नये. अन्यथा बजरंग दल चलो संभाजीनगर… व छत्रपती संभाजी महाराज के सन्मान में बजरंग दल मैदान मे… हा नारा देत कारसेवा करेल, असा इशारा देणारे निवेदन सोमवारी १७ मार्च रोजी राज्यातील सर्व तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय येथे तिथीनुसारच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे महाराष्ट्र-गोवा बजरंग दल क्षेत्राचे संयोजक विवेक कुलकर्णी यांनी दिला आहे. यावेळी जिल्हा सहमंत्री शरदराव नगरकर उपस्थित होते.
    Car Accident : पार्टनरशिपमध्ये जिम, एकाची १५ दिवसाची लेक, दुसऱ्याची बायको प्रेग्नंट, पुण्यातील सख्ख्या मित्रांचा एकत्रच अपघाती मृत्यू
    गुरु गोविंदसिंह व त्यांच्या परिवाराला अतिशय क्रूरपणे औरंगजेबाने ठार केले. गुरूंच्या दोन बाल कुमारांना तर याच औरंगजेबाच्या सरदारांनी भिंतीत चिरुन मारले. त्याने श्रीकाशी विश्वेश्वराचे देऊळ फोडले, काशीतील बिंदु माधवाचे मंदिर फोडले, मथुरेतील प्रसिद्ध श्रीकेशवाचे मंदिर फोडून तेथील मूर्ती आग्रा येथील मशिदीच्या पायर्‍याखाली गाडण्यात आली. सौराष्ट्राचे सोमनाथ मंदिर यानेच उद्ध्वस्त केले. हिंदूंच्या सर्व सण, यात्रा यांवर बंदी घातली. हिंदूंवर जिझिया कर या औरंग्याने लादला. त्र्यंबकेश्वर येथील मंदिर पण याने नष्ट केले. जेजुरी गडावर आक्रमण केले, याकडे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने लक्ष वेधले.
    Beed Crime : श्रावणी बाळा, तुझ्या बापूला माफ कर, फेसबुकवर शेवटची पोस्ट, सहा ‘राक्षसां’ची नावं, बीडमध्ये शिक्षकाने आयुष्य संपवलं
    हिंदू युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदू स्वराज्याचा तर या औरंगजेबाने कायम द्वेष केला. हिंदू प्रताप सूर्य छत्रपती संभाजी महाराज यांचा अतोनात छळ औरंग्याने केला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी राणी येसूबाई व पुत्र शाहू महाराज यांना कैद केले. छत्रपती शाहू महाराजांचा धर्म परिवर्तनाचा प्रयत्न अनेक वेळा केला. नेताजी पालकरांना धर्मांतरण करण्यास यानेच भाग पाडले. असा हिंदुद्वेष्टा या देशाशी, इथल्या संस्कृतीशी, परंपरांशी कुठलीही आत्मियता नसणारा व छत्रपती संभाजी महाराजांचा छळून वध करणारा औरंग्याचे कुठलेही स्मारक, कबर भारतात असणे म्हणजे एक प्रकारे त्याने केलेल्या अन्यायांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे, असे म्हणणे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed