Buldhana Farmer Ended Life: कैलास हे शेतावर गेले असताना बुधवारीच चार पानांचे पत्र सरकारला लिहिले. यानंतर रात्रीच शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
कैलास हे शेतावर गेले असताना बुधवारीच चार पानांचे पत्र सरकारला लिहिले. यानंतर रात्रीच शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या पत्रात त्यांनी सरकारकडील आपल्या मागण्या, गावातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय आणि कुटुंबाच्या अनुषंगाने आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
प्रेम करणं गुन्हा आहे का? चाळिशीतील विवाहित प्रेमीयुगुलाने आयुष्य संपवलं; चिठ्ठीत सोळा जणांची नावं
‘मी अपयशी ठरलो. शेतीच्या उत्पादनात सातत्य नव्हते. अस्मानी संकटे आली. घरसंसार, शेती, कोर्टकचेरी, मुलांचे शिक्षण, सुख देण्यातही असमर्थ ठरलो. सर्वांसाठी मी शून्य होऊन चाललो आहे. शेती, मातीवर खूप कविता लिहिल्या. शेतकऱ्यांसाठी स्वागतगिते लिहिली. मात्र ती प्रकाशित करता आली नाही. या भागात पाणी द्या म्हणजे माझ्यासारखा शेतकरी भरकटणार नाही आणि कुणाचा बळीही जाणार नाही’, अशा भावनाही कैलास यांनी आपल्या पत्रात मांडल्या आहेत.
सोलापुरात २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; विवस्त्र करुन पाठीला लोखंडी सळीने दिलेले चटके, घटनेनं खळबळ
‘शेतीच्या उत्पादनात सातत्य नसल्याने मी भरकटलो. घरगाडा, शेतीचा गाडा, कोर्टकचेरी, मुलांचे शिक्षण करण्यात मी असमर्थ ठरलो. मी स्वत: शून्य झालो. मागेही शून्य सोडून चाललो आणि दुसऱ्यांनाही म्हणजे मित्र, नातेवाइक व सहकारी यांनाही शून्य करून चाललो. मूल, बाबा, बहिणी, भाऊजी, बायको यांनाही शून्यच करून जातोय,’ अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली आहे. ‘कुणालाही दोषी धरू नका. माझ्यावरच मृत्यूपश्चात गुन्हा दाखल करा’, असा उल्लेखही त्यांनी पत्रात केला आहे.

