• Sat. Mar 7th, 2026
    आमदारकाका करणार विद्यार्थ्यांचे स्वागत; शाळेच्या पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधींची शाळा भेट

    Educational News: शालेय शिक्षण विभागाने ‘१०० शाळांना भेटी’ कार्यक्रम जाहीर केला असून त्याअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदार त्यांच्या मतदारसंघातील जवळच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.

    हायलाइट्स:

    • ‘१०० शाळांना भेटी’ चा कार्यक्रम जाहीर
    • पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदारांची हजेरी
    • विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची योजना
    महाराष्ट्र टाइम्स
    100 school visit

    मुंबई: नव्या शैक्षणिक वर्षात पाल्याच्या शाळेतील पहिल्याच दिवशी स्वागताला हसतमुखाने मुख्यमंत्री किंवा स्थानिक आमदार दिसले, तर आश्चर्य मानू नका! शालेय शिक्षण विभागाने ‘१०० शाळांना भेटी’ कार्यक्रम जाहीर केला असून त्याअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदार त्यांच्या मतदारसंघातील जवळच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. त्याचसोबत शालेय शिक्षण मंत्री व शिक्षण विभागाचे अधिकारी १०० शाळांना भेटी देऊन शाळांची पाहणी करणार आहेत.छोट्या-मोठ्या शिशुवर्गातून पहिल्या इयत्तेत येणाऱ्या लहान मुलांसाठी शाळेचा पहिला दिवस काहीसा आव्हानात्मक असतो. आईवडिलांचा हात सोडून शाळेच्या इमारतीत येताना अनेक जण भोकाडही पसरतात. मात्र मुलांसाठी हा दिवस आनंददायी आणि सोहळा करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘१०० शाळांना भेटी’ या उपक्रमांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार यांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील जवळच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची योजना आखली आहे.
    प्रेम करणं गुन्हा आहे का? चाळिशीतील विवाहित प्रेमीयुगुलाने आयुष्य संपवलं; चिठ्ठीत सोळा जणांची नावं
    या भेटीदरम्यान लोकप्रतिनिधी, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव हे शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेत जाऊन विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्याशिवाय शालेय शिक्षणमंत्री व शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासाठी ‘१०० शाळांना भेटी’ हा कार्यक्रमही आखण्यात आला आहे.
    सोलापुरात २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; विवस्त्र करुन पाठीला लोखंडी सळीने दिलेले चटके, घटनेनं खळबळ
    या कार्यक्रमांतर्गत मंत्री, उपमंत्री आणि अधिकारी यांनी जिल्ह्यातील १०० शाळांना भेटी देण्याचे नियोजन करायचे आहे. या भेटीदरम्यान हे अधिकारी शाळेतील कामकाज, शैक्षणिक दर्जा आणि इतर सोयीसुविधा यांचा आढावा घेतील. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये कसे प्रवेश घेतील, याबाबतही हे अधिकारी व मंत्री शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांच्याशी चर्चा करणार आहेत.
    घरातच खोदला वीस फूट खोल खड्डा; गुप्तधनासाठी लहान मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न, जालन्यात भोंदूबाबाला अटक
    या भेटींदरम्यान शाळा इमारत, विद्यार्थ्यांसाठी खेळाच्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी, शालेय पोषण आहार यांचाही आढावा घेतला जाणार आहे. तसेच धोकादायक इमारत, अस्वच्छ किंवा पाण्याअभावी बंद शौचालये अशा समस्या आढळल्यास अधिकारी वर्ग तातडीने त्या सोडवण्यासाठी सूचना देतील. त्यामुळे शाळांमधील अनेक समस्या तातडीने निकाली निघण्याची शक्यता आहे.
    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed