• Sat. Jun 13th, 2026

    Jalgaon News : जळगावात भूकंप नाही तर मग काय? ‘त्या’ गूढ आवाजाने संभ्रम वाढवला

    Jalgaon News : जळगावात भूकंप नाही तर मग काय? ‘त्या’ गूढ आवाजाने संभ्रम वाढवला

    Jalgaon Earthquake claim by People : जळगावात बुधवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानक मोठा आवाज आला. यावेळी जमीन अक्षरश: हादरली. त्यामुळे नागरीक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडले. भूकंपामुळे हा सगळा प्रकार घडला असा नागरिकांचा दावा आहे. पण जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत वेगळीच माहिती सांगितली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    निलेश पाटील, जळगाव : चाळीसगाव तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास दोन मोठे आवाज आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून कुठलीही भूकंपाची नोंद या संबंधित झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी अफेवर विश्वास ठेवू नये असंदेखील त्यांनी आवाहन केलं आहे. सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास हा गूढ आवाज शहरासह ग्रामीण भागात ऐकू आला. काही सेकंदाच्या अंतराने दुसऱ्यांदा तोच आवाज पुन्हा ऐकू आला, आणि त्यासोबत हलकासा भूचालसदृश कंपनही जाणवले. यामुळे घबराट उडालेल्या नागरिकांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली. काहींनी हा आवाज मोठ्या स्फोटासारखा असल्याचे सांगितले. तर काहींनी तो आकाशात घडलेल्या घटनेशी संबंधित असावा, असा अंदाज व्यक्त केला.

    प्रशासनाची तातडीने दखल

    घटनास्थळी स्थानिक प्रशासनाने पाहणी केली आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या संदर्भात नाशिक येथील मेरी संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या माहितीनुसार, भूकंपाची कोणतीही नोंद झालेली नाही. त्यामुळे हा आवाज आणि जमिनीत जाणवलेले कंपन भूकंपाशी संबंधित नाही.

    “चाळीसगाव तालुक्यात दोन वेळा मोठा आवाज ऐकू आल्याची माहिती मिळाली होती, नागरिकांनी यामुळे भूकंपाचा अंदाज वर्तवला. मात्र, मेरी संस्थेच्या अहवालानुसार भूकंपाची नोंद नाही. तरीही नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.
    Sudhir Mungantiwar : ‘धाडस करा, कर्जमुक्तीसाठी काय घाबरता?’, सुधीर मुनगंटीवार यांचे थेट सरकारला सवाल
    नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणया गूढ आवाजाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. “अचानक मोठा आवाज झाला आणि काही सेकंदांसाठी जमिनीला कंपन जाणवलं. आम्ही लगेच घराबाहेर पडलो. हा स्फोटासारखा आवाज नक्की कशामुळे झाला? हे समजत नाही,” असे स्थानिक नागरिकाने सांगितले. दरम्यान, संबंधित घटना ही भूकंप नसल्याने आवाज नेमका का आला आणि जमीन नेमकी कशी हादरली? या प्रश्नाचं उत्तर अद्याप समजू शकलेलं नाही. याबाबत आगामी काळात काही माहिती मिळते का? ते पाहणं महत्त्वाचंं आहे.

    निलेश पाटील

    लेखकाबद्दलनिलेश पाटीलमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मध्ये जळगाव ‘जिल्हा प्रतिनिधी’ म्हणून कार्यरत. गेल्या 12 वर्षापापूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात. तरुण भारत, सकाळ, लाईव्ह ट्रेण्ड न्यूजमधून प्रवास करीत मटा ऑनलाइनपर्यंत प्रवास.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed