Mumbai News: अरबी समुद्रात आठ वर्षांच्या कालावधीनंतर, मात्र १९७४ नंतर (तत्कालिन ‘बॉम्बे हाय’नंतर) पहिल्यांदाच तब्बल १८ हजार चौरस किमी क्षेत्रफळाहून अधिक खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत.
मुंबई, महाराष्ट्र आणि समुद्र व खनिज तेल यांचे जवळचे नाते आहे. याच मुंबईच्या समुद्रात जवळपास ७५ सागरी मैल अंतरावर १९७४मध्ये ‘बॉम्बे हाय’ येथे खनिज तेलाचा मोठा साठा सापडला होता. ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनीकडून (ओएनजीसी) त्याठिकाणी आजतागायत मोठ्या प्रमाणावर खनिज तेल उत्खनन होत आहे. त्या माध्यमातून हजारो मुंबईकरांना रोजगार मिळाला आहे. पुढे २०१७मध्ये ‘अमृत’ व ‘मुंगा’ या दोन तेल विहिरींवर काम सुरू झाले. आता मात्र अमृत व मुंगा यांच्यापेक्षा चारपट अधिक परिघ असलेले दोन साठे समोर आले आहेत.
धारावीच खरे मेक इन इंडिया! काँग्रेस नेते राहुल गांधींनी धारावीकरांसह चर्मकारांशी साधला संवाद
भारताचा सार्वभौम अधिकार असलेल्या किनाऱ्यापासून २०० सागरी मैल अंतरापर्यंतच्या भागात खनिज तेल व वायू उत्खननासाठी केंद्र सरकारकडून निविदेअंती खुला परवाना दिला जातो. त्याला ओपन अँकरेज लायसन्सिंग पॉलिसी (ओएएलपी) संबोधले जाते. याच ‘ओएएलपी’ची दहावी फेरी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने घोषित केली आहे. त्यामध्येच डहाणू व तळ कोकणातील साठ्यांचा समावेश.
अमरावतीत साडेचार हजार बांगलादेशींना जन्मदाखले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
याअंतर्गत डहाणूच्या समुद्रात ५,८३८.०३ व तळ कोकणात सिंधुदुर्गजवळील समुद्रात १३ हजार १३१.७२ चौरस किमी क्षेत्रफळावर असे संभाव्य खनिज तेलसाठे समोर आले आहेत. त्या ठिकाणी उत्खननासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. ‘हे दोन्ही तेलसाठे २०१७च्या तुलनेत खूप मोठे आहेत. १९७४नंतर पहिल्यांदाच मुंबई किंवा महाराष्ट्र ऑफशोअरवर असे साठे समोर आले आहेत’, असे केंद्र सरकारी तेल उत्पादन कंपन्यांमधील सूत्रांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.
अबब! ४५ दिवसांत ३० कोटींची कमाई? कोण आहे प्रयागराजचा पिंटू, ज्याचं CM योगी आदित्यनाथ यांनी स्वतः केलं कौतुक
चार प्रकारचे एकूण २५ साठे‘ओएएलपी १०’ मध्ये एकूण २५ खनिज तेलसाठे समोर आले आहेत. त्यांचे एकूण क्षेत्रफळ १ लाख ९१ हजार ९८६ चौरस किमी इतके आहे. त्यात महाराष्ट्राशी निगडित १८ हजार ९६९.७५ चौरस किमी क्षेत्रफळाच्या साठ्यांचा समावेश आहे. हे २५ साठे चार प्रकारांत आहेत. त्यामध्ये जमिनीवरील, उथळ पाण्यातील, खोल समुद्रातील व अति खोल समुद्रातील यांचा समावेश आहे. महाराष्ट्राशी निगडित दोन्ही साठे उथळ समुद्रातील असून, त्यांचे अंतर किनाऱ्यापासून ८६ सागरी मैलापर्यंत असेल.

