• Sat. Mar 14th, 2026
    Maharashtra Live News Today: राज्यविधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन

    उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

    उष्म्याचा तडाखा वाढत असताना तब्येतीच्या अनेक तक्रारीही डोके वर काढत आहेत. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी काळजी घ्यायला हवी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. आरोग्यविभागानेही निर्देश दिले आहेत. यासंदर्भातील आपल्या प्रकृतीकडे त्यातील बदलत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दिवसा, तसेच रात्रीही शक्यतो बाहेर जाणे टाळा. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी दाट झाडे तसेच हिरवळ कमी होत चालली आहे. काँक्रीटीकरण वाढत चालले आहे. सूर्यास्तानंतरही वातावरणातील उष्मा कायम राहतो. पूर्वपिक्षा आता तापमानामध्ये होणारी वाढ अधिक तापदायक आहे. त्यामुळे कोणताही शारीरिक ताप जाणवला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला आपत्कालीन वैद्यकीय विभागातील तज्ज्ञ डॉ. प्रीतम गायकवाड यांनी म्हटले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed