Mumbai News: जानेवारी २०२५ पासून ते २७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ४१४ हॉटेलना नोटीस बजावून पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक आणि पीएनजीवरील शेगड्यांचा वापर करण्याचे वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वाधिक ‘तंदूर’चा वापर हा भायखळा, कुर्ला आणि वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मीमधील हॉटेलमध्ये होत आहे.
हायलाइट्स:
- गेल्या दोन महिन्यांतील आकडेवारी
- उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी
- महापालिकेच्या पर्यावरण विभागाची कारवाई
त्यानुसार मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून हॉटेलांची तपासणी करून नोटीस बजावण्यात येत आहे. हॉटेलच्या हद्दीत तंदूरआधारित नॉन व्हेज, रोटी आदी पदार्थ केले जातात. ही संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा हॉटेलांची तपासणी करून नोटीस बजावली जात असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबईत १६ हजारांपेक्षा अधिक लहानमोठी हॉटेल असून आत्तापर्यंत ४१४ हॉटेलांना यासंदर्भात नोटिशी बजावल्या आहेत. यापैकी सर्वाधिक म्हणजे, ६१ नोटिशी महापालिकेच्या ई वॉर्डमधील भायखळ्यातील हॉटेलांना बजावल्या आहेत. तर वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी, लोअर परळ या जी दक्षिण वॉर्डमध्ये १०७ हॉटेलांना नोटिशी बजावल्या आहेत. तर कुर्ला वॉर्डमध्ये ६३, परळ, लालबाग या एफ दक्षिण वॉर्डमध्ये ४३ आणि सांताक्रूझ, खार, वांद्रे पूर्व या एच पूर्व वॉर्डमधील २६ हॉटेलांना नोटीस देण्यात आली आहे.

