• Wed. Mar 11th, 2026

    सेतू कार्यालय आता गुजरातची कंपनी चालवणार, वैभव नाईकांचा दावा; नितेश राणेंचे प्रत्युत्तर, ‘जिल्ह्याच्या भूमिपुत्रांनाच…’

    सेतू कार्यालय आता गुजरातची कंपनी चालवणार, वैभव नाईकांचा दावा; नितेश राणेंचे प्रत्युत्तर, ‘जिल्ह्याच्या भूमिपुत्रांनाच…’

    Vaibhav Naik on Nitesh Rane : वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेतू कार्यालय गुजरात मधील कंपनी चालत असल्याचा आरोप केला. त्यावर नितेश राणेंनी प्रत्युत्तर देत भूमिपुत्रांनाच सेतू केंद्रामध्ये प्राधान्य दिले जाईल असं म्हटलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : राज्याचे उद्योग महाराष्ट्र बाहेर गुजरात येथे जात असल्याचा आरोप होत असतानाच आता वैभव नाईक यांनी एक मोठा आरोप करत महायुतीवर सरकारवर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेतू कार्यालय गुजरात मधील एक कंपनी चालवणार असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. यावरून आता वैभव नाईक आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. वैभव नाईक यांच्या टीकेला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
    Sindhudurg News : पुण्यातील पाच पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू; आनंदाच्या क्षणी आक्रित घडलं
    ‘आता त्यांच्याकडून कमी पगारावर काम करणाऱ्यांना नेमण्यात येणार आहे. त्यामुळे हे सर्व आता गुजरातला देण्याचा डाव शासनाचा आहे. इथल्या सत्ताधाऱ्यांनी जमलं तर त्याकडे लक्ष द्यावं. कारण ते सुद्धा गुजरातच्या अधिपत्याखाली राजकारणामध्ये काम करत आहेत’, अशी टीका वैभव नाईक यांनी केली. वैभव नाईक आणि विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपांना पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
    Solapur News : शर्टाने हात-पाय बांधले, हत्या करुन उसाच्या शेतात पुरलं, सोलापुरात भयंकर घडलं; पोलिसांनी असं उकललं हत्येचं गूढ

    नितेश राणे काय आरोपांवर काय म्हणाले?

    ‘ते कार्यालय चालवणारे मराठी आहेत. मी इथे बसलेलो आहे ना’, माझ्या इथल्या लोकांना त्याचा फायदा कसा मिळवून द्यायचा, रोजगार कसा मिळवून द्यायचा त्यासाठी नितेश राणे पालकमंत्री म्हणून सक्षम आहेत. माझ्या स्थानिक भूमीपुत्रांवर कोणीही अन्याय करू शकणार नाही. मी जिल्ह्यातल्या जनतेला विश्वास देतो कंपनी कुठलीही असो जिल्ह्याच्या भूमिपुत्रांनाच त्या सेतू केंद्रामध्ये प्राधान्य दिले जाईल’, असं मंत्री नितेश राणे म्हणाले.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्राचं कंत्राट गुजरात येथील एका कंपनीला देण्यात आल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. यावर बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी स्थानिकांवर अन्याय होऊ देणार नाही असं उत्तर दिलं आहे.
    … तर गय केली जाणार नाही, नितेश राणेंची तंबी; ‘त्या’ मुद्दावरुन अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल
    दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नऊ तालुक्यातील सेतू सुविधा केंद्र चालवण्याची जबाबदारी गुजरातची कंपनी असलेल्या गुजरात इन्फोटेककडे देण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांसाठी याच कंपनीकडे सेतू कार्यालय चालवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे सेतू सुविधा केंद्र गुजराती कंपनीमार्फत चालवण्यात येणार असल्याने ठाकरे गटाने संताप व्यक्त केला आहे.

    सेतू कार्यालय आता गुजरातची कंपनी चालवणार, वैभव नाईकांचा दावा; नितेश राणेंचे प्रत्युत्तर, ‘जिल्ह्याच्या भूमिपुत्रांनाच…’

    राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून लवकरच आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दिला आहे. तर सत्ताधारी गुजरातच्या अधिपत्त्याखाली असल्याची टीका वैभव नाईक यांनी केली आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *