Manikrao Kokate: माजी कृषिमंत्री धनंजय मुंडेंपाठोपाठ विद्यमान कृषिमंत्री अॅड. कोकाटेंच्या शिक्षा प्रकरणामुळे राष्ट्रवादी आता पूर्णतः ‘बॅकफूट’ वर गेल्याचे चित्र आहे.
माजी कृषिमंत्री धनंजय मुंडेंपाठोपाठ विद्यमान कृषिमंत्री अॅड. कोकाटेंच्या शिक्षा प्रकरणामुळे राष्ट्रवादी आता पूर्णतः ‘बॅकफूट’ वर गेल्याचे चित्र आहे. या प्रकरणामुळे अॅड. कोकाटे आता पालकमंत्रिपदाच्या शर्यतीतून जवळपास बाद झाल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे पालकमंत्रिपदावरील भाजपचा दावा अधिक भक्कम झाल्याचा दावाही भाजप नेते करीत आहेत. अॅड. कोकाटेंना मंत्रिपदाची संधी दिल्यामुळे भुजबळ नाराज झालेले असून, त्यांच्यात आणि राष्ट्रवादीत दुरावा निर्माण झाला आहे. नाशिकमधून तब्बल सात आमदार निवडून आल्याने पवारांनी नाशिकमधून नरहरी झिरवाळ आणि कोकाटेंना संधी दिली. कोकाटे यांनी थेट नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा ठोकला.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा नागपूर पॅटर्न चर्चेत; ३००० महिलांनी एकत्र येऊन सुरु केली पतपेढी
भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या दाव्यामुळे पालकमंत्रिपदाचा पेच निर्माण झाला आहे. रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळाले होते. नाशिकचे भाजपला मिळाले होते. परंतु, दोन्ही ठिकाणी स्थगिती दिल्यामुळे पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला नसतानाच ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात अॅड. कोकाटेंना न्यायालयाने गुरुवारी दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यामुळे राष्ट्रवादीतील आजी-माजी कृषिमंत्री संकटात आले आहेत. कोकाटे यांनी शिक्षेला आव्हान देण्याची तयारी केली असली, तरी त्यांच्यावरील राजकीय संकट तूर्तास कायम राहणार आहे. या प्रकरणामुळे तूर्तास तरी कोकाटे पालकमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाद झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोकाटे यांनी मंत्रिपद मिळवले असले, तरी आधीच्या कर्मामुळे त्यांच्यावर आता मंत्रिपदासह संभाव्य पालकमंत्रिपदही गमावण्याची वेळ आली आहे.
निवडणुकीतील पराभवासाठी ईव्हीएम नव्हे, आपणच जबाबदार; अमित ठाकरेंची परखड भूमिका
भाजपला अप्रत्यक्ष दिलासा
नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत भाजपचे मंत्री गिरीश महाजन, अॅड. कोकाटे आणि शिवसेनेचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आहेत. नाशिकचे पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी तीनही पक्षांमध्ये चुरस असताना कोकाटे आता या शिक्षा प्रकरणामुळे आपसूकच बाद झाल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत आता भाजप आणि शिवसेनाच उरली आहे. आजी-माजी कृषिमंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे राष्ट्रवादी ‘बॅकफूट’वर गेल्याचा फायदा आता भाजप आणि शिवसेना उचलण्याची शक्यता आहे. रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडून काढून शिवसेनेला मिळाल्यास नाशिकच्या पालकमंत्रिपदावर भाजपचा दावा भक्कम होणार आहे. त्यामुळे या घटनेने भाजपलाही अप्रत्यक्षपणे दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

