Authored byमानसी देवकर | Contributed byअमूल जैन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम20 Feb 2025, 9:14 am
माजी खासदार राजू शेट्टी रायगडमध्ये आयोजित पीएनपी चषकाच्या उद्घाटनाला आले होते. पीएनपी चषकाची भव्यता पाहून आनंद झाल्याचे राजू शेट्टी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी बीडमधील संतोष देशमुख प्रकरणावरही भाष्य केले. राजकीय नेते गुंडाना संरक्षण देतात अशी टीका राजू शेट्टींनी केली. सत्तेतून संपत्ती गोळा करण्याचं काम सुरू असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. तरुणांनी सिस्टीमच्या विरोधात पेटून उठलं पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.