Mumbai News : आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर भरपाईसाठी मिळालेला अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर भिकाजी यांनी ॲड. साईनंद चौगुले यांच्यामार्फत २०२३ मध्ये पहिले अपिल दाखल केले होते.
आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर भरपाईसाठी मिळालेला अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर भिकाजी यांनी ॲड. साईनंद चौगुले यांच्यामार्फत २०२३ मध्ये पहिले अपिल दाखल केले होते. त्याविषयीच्या सुनावणीअंती न्या. शर्मिला देशमुख यांनी नुकताच हा निर्णय दिला.
काय आहे प्रकरण?
भिकाजी यांचा मुलगा ४ सप्टेंबर २०१८ रोजी प्रभादेवी येथील आपल्या कामाच्या ठिकाणी निघाला होता. सकाळी ८.३० वाजता प्रचंड गर्दीच्या वेळेत त्याने मालाडहून चर्चगेट लोकल पकडली आणि तो दारातच उभा होता. मात्र, धावत्या लोकलमध्ये आतून अचानक गर्दीचा रेटा आल्याने त्याचा तोल जाऊन तो खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला रेल्वे पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. मात्र, दाखल करून घेण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
New Delhi Railway Station Stampede : तडे गेलेल्या स्क्रीनमधून लेकीचा फोटो दाखवला, बाप ढसाढसा रडला; डॉक्टर म्हणाले लवकर आला असतात तर…
रेल्वेचा अजब युक्तिवाद
‘लोकलमधून तरुणाचा पडून मृत्यू झाल्याचे रेल्वे पोलिसाने आपल्या अहवालात म्हटले असले तरी प्रत्यक्षात तो रेल्वे रूळ ओलांडताना लोकलची धडक लागल्याने मृत्युमुखी पडला. शिवाय त्या तरुणाकडे वैध तिकीट किंवा मासिक पास होते, असे आढळले नाही. त्यामुळे त्याचे कुटुंब भरपाईसाठी पात्र ठरत नाही’, असा युक्तिवाद रेल्वेतर्फे मांडण्यात आला.
Mysuru Family Suicide : आई, मुलगा, सून आणि नातू… एकाच कुटुंबातील चौघं मृतावस्थेत आढळले, एका चिठ्ठीमुळे खळबळ
तर, ‘रेल्वे पोलिसाच्या अहवालात तसेच तरुणाच्या मृत्युनंतरच्या अहवालातही तो लोकलमधून पडल्याचे नमूद आहे. त्याच्या शरीराची झडती घेतल्यानंतर रेल्वेचा मासिक पास आढळल्याचेही नमूद आहे’, असा युक्तिवाद ॲड. चौगुले यांनी अर्जदारांतर्फे मांडला.

