• Thu. Mar 12th, 2026
    कुष्ठरोगाचे आव्हान कायम; राज्यात गेल्या पाच वर्षांत ९८ हजार रुग्ण, अतिजोखमीच्या ठिकाणी सर्वेक्षण

    Leprosy Cases In Maharashtra: आशा व पुरुष स्वयसेवकांच्या मदतीने ग्रामीण तसेच शहरातील अतिजोखमीच्या शहरी भागांमध्ये घरोघरी सर्वेक्षण करून ३० टक्के लोकसंख्येमध्ये कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे.

    हायलाइट्स:

    महाराष्ट्र टाइम्स
    leprosy2

    मुंबई : राज्यात कुष्ठरोगाचे निर्मूलन अद्याप झाले नसून, मागील पाच वर्षांत राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून ९८ हजार ३५० कुष्ठरुग्णांची नोंद झाली आहे. तर, यावर्षी ही संख्या १५ हजार इतकी आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या आजाराचे निर्मूलन करण्याचे आव्हान अजूनही कायम आहे. आशा व पुरुष स्वयसेवकांच्या मदतीने ग्रामीण तसेच शहरातील अतिजोखमीच्या शहरी भागांमध्ये घरोघरी सर्वेक्षण करून ३० टक्के लोकसंख्येमध्ये कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे.राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वेक्षण, शिक्षण आणि उपचार या तत्त्वावर कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबवण्यात आला. प्रभावी औषधांचा समावेश असलेल्या बहुविध औषधोपचार पद्धतीच्या वापरामुळे १९८१-८२ मध्ये दहा हजार लोकसंख्येमध्ये ६२.४० असणारे कुष्ठरोगाचे प्रमाण १९९१-९२मध्ये १४.७० इतके कमी झाले. तर, २०२३-२४मध्ये हे प्रमाण १.१६ इतके झाले होते.
    FASTag New Rule: १ एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य; अन्यथा भरावा लागेल दुप्पट टोल
    राज्यात अधिकाधिक नवीन कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी कुष्ठरुग्ण कर्मचारी व सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी वाडीवस्ती, दाटीवाटीच्या शहरी भागांना भेटी देऊन प्राथमिक स्तरावरील अधिकाधिक कुष्ठरुग्ण शोधून काढले. ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे असलेल्या माहितीनुसार, कुष्ठरोग शोध मोहिमेंतर्गत २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये ६ हजार ७४४ नवीन कुष्ठरुग्ण आढळले. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशीव, यवतमाळ, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या निवडक २० जिल्ह्यांमध्ये ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये ही मोहीम राबवण्यात आली.
    तुमच्याकडे परिवारवाद, तर आमचा महाराष्ट्रवाद! एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतून ठाकरेंवर टीका
    या आजाराचे रुग्ण शोधण्यासाठी कुसुम या मोहिमेचीही सुरुवात करण्यात आली आहे. कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेमध्ये आश्रमशाळा, वसतिगृहे, वीटभट्टी, खाणकामगार, कारागृहातील व्यक्ती तसेच विविध कारणांमुळे स्थलांतरित झालेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यासाठी कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) ही मोहीम १६ ते २० डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये राबवण्यात आली. त्यात १,०२२ नवीन रुग्णांना शोधण्यात आले. स्पर्श मोहिमेंतर्गत २६ जानेवारी रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये घेण्यात आलेल्या ग्रामसभेत तसेच सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये कुष्ठरुग्ण शोधण्याबद्दल प्रतिज्ञा घेण्यात आली आहे.
    पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय? नाना पटोलेंचा सवाल; कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
    विषाणूची लागण झाल्यानंतर पाच ते सहा वर्षांपर्यंत दृश्य स्वरूपामध्ये या आजाराची लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे रुग्णांची त्वरित नोंद होत नाही. आरोग्य विभागातील वरिष्ठ तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेसंदर्भात आऱोग्य विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. ठाणे, मुंबई, रायगडसह अन्य कोणत्या जिल्ह्यांमध्ये कुष्ठरुग्ण आढळून येत आहेत याकडे अधिक कटाक्षाने लक्ष ठेवण्यात येत आहे. करोनाकाळामध्ये या रुग्णसंख्येची त्वरित नोंद न झाल्यामुळे रुग्णांचे प्रमाण तुलनेने वाढीस लागल्याचे कळते.
    (पूर्वार्ध)
    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *