• Tue. Mar 10th, 2026
    पक्षप्रवेश सोडून एकनाथ शिंदे दालनात, प्रकरण नेमकं काय?, वाचा

    Eknath Shinde News : राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून बाहेर पडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशावेळी अचानक स्टेज सोडून एकनाथ शिंदे गेल्याने विविध चर्चा रंगताना दिसल्या.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे नाराज असल्याची सतत चर्चा रंगताना दिसत होती. हेच नाहीतर अनेकदा त्यांची उद्धव ठाकरेंसोबत तू तू मैं मैं देखील झाली. उद्धव ठाकरे यांनी राजन साळवींंना थेट कोणत्या पक्षात प्रवेश करायचा ते करा म्हटले होते. आता राजन साळवी यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केलाय. फक्त राजन साळवी हेच नाहीतर त्यांच्या हजारो समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश केला. राजन साळवी हे भाजपात जाणार असल्याची सुरूवातीला चर्चा होती.

    राजन साळवींचा शिवसेनेत प्रवेश

    राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्ये उपस्थित होते. भाषणावेळी एकनाथ शिंदे यांच्यासमोरच राजन साळवी हे भावूक झाल्याचे बघायला मिळाले. अखेर राजन साळवी यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र केला आहे. मध्यंतरी चर्चा होती की, राजन साळवी हे भाजपामध्ये प्रवेश करणार. मात्र, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
    Rajan Salvi : अखेर ठाकरे गटाला मोठं खिंडार, राजन साळवी यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेशएकनाथ शिंदे स्टेजवरून उतरून थेट दालनात

    राजन साळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू असतानाच अचानक एकनाथ शिंदे हे स्टेजवरून उतरून थेट दालनात गेले. यामुळे विविध चर्चा या रंगताना दिसल्या. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरू असताना स्टेज सोडून अचानक शिंदे हे दालनात गेल्याने आता नेमके काय घडले याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, शिंदे दालनात नेमके कशामुळे गेले, याबद्दल काही खुलासा हा होऊ शकला नाहीये. महत्वाची मिटिंग असल्याने ते गेल्याचेही सांगितले जातंय.

    हजारो कार्यकर्त्यांसह राजन साळवी एकनाथ शिंदेंसोबत

    गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा रंगताना दिसली. मुळात म्हणजे सुरूवातीपासूनच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच बघायला मिळाली. शेवटी मुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली. मुख्यमंत्रिपद मिळाले नसल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचे सातत्याने सांगितले जातंय.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed