राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मांडलेल्या मतावर अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. “अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आमच्यावर गप्पा मारता”, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
“अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आमच्यावर गप्पा मारता”, असा जोरदार प्रहार अजित पवार यांनी राज ठाकरेंवर साधला. “या वेळेस आम्ही कष्ट घेतले होते, मेहनत घेतली होती. तुम्ही सगळे बघत होता. मलाही एका लोकसभेच्या निवडणुकीत मुलाला निवडून आणता नाही आलं. माझ्या पत्नीलाही या लोकसभा निवडणुकीत निवडून आणता आलं नाही. लोकांनी कौल दिला. त्यात ईव्हीएममध्ये गडबड झाली नाही. जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीत मान्य केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
GBS in Mumbai : पुण्यात थैमान घालणाऱ्या GBS आजाराचा मुंबईत शिरकाव, मुंबईकरांनो काळजी घ्या!
राहुल गांधींच्या वक्तव्यावर काय म्हणाले?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मतदारयादीबाबत केलेल्या वक्तव्यावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “त्यांना म्हणावं, तुम्ही तपासा. तुमची टीम नेमा. उद्या आता दिल्लीचा निकाल लागल्यावरही जे हरतील ते असंच काहीतरी सुरु करतील. हा रडीचा डाव आहे. त्याला काहीच अर्थ नाही. जनता जनार्दन सर्वस्व आहे. ते लोकशाहीत मतदान करतात. त्या पद्धतीने लोक निवडून येतात. हे बाकीचे जण लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करतात. तुम्ही मला मगाशी प्रश्न विचारला, त्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते खचू नयेत यासाठी ते अशाप्रकारचं वक्तव्य करतात. त्यांना स्फूर्ती देण्याकरता आपल्याला मते मिळाली पण गेली कुठे असं काहीतरी सांगायचं”, अशी टीका अजित पवार यांनी केली.

