बीड : खुंटेफळ साठवण तलावामुळे आष्टी तालुक्याला मिळणार नवसंजीवनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा
बीडच्या दुष्काळी आष्टी तालुक्याला नवसंजीवनी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज आष्टी येथील खुंटेफळ साठवण तलावाचे भूमिपूजन होणार आहे. या तलावामुळे दुष्काळी आष्टी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी मिळण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. यापूर्वी दिवंगत विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, अशोक चव्हाण यांच्या नंतर मराठवाड्याला पाणी मिळाले पाहिजे, मराठवाड्यात वॉटर ग्रीड झालं पाहिजे. अशी भावना देवेंद्र फडणवीस यांची आहे. आणि याच अनुषंगाने आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा असल्याचे देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे.
