• Tue. Mar 10th, 2026
    हाफ टाइममध्ये पंचाशी वाद, थेट पृथ्वीराज विजयी; नेमकं काय घडलं?, महेंद्र गायकवाडने सगळं सांगितलं

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Feb 2025, 9:28 am

    महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य सामन्यावेळी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. या सामान्यात पंचाने शिवराज राक्षेला बाद केलं. त्यामुळे शिवराजने चिडून पंचाला लाथ मारली. त्यानंतर मैदानात एकच गोंधळ उडाला. धक्काबुक्की आणि त्यानंतर अर्धा तास गोंधळ सुरू होता. त्यानंतर महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामना सुरू झाला. यावेळी हाफ टाइममध्ये महेंद्रने पंचाशी वाद घालयाला सुरुवात केली. त्याने पंचाला शिवागीळ केली आणि हुज्जत घालत थेट मैदानच सोडलं. त्यामुळे पृथ्वीराजला विजयी घोषित करण्यात आलं. मात्र, या दोन्ही पैलवानांच्या गैरवर्तनाची दखल घेऊन त्यांना तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान कुस्तीपटू महेंद्र गायकवाड याच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आदित्य भवार यांनी….

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed