• Wed. Mar 11th, 2026
    Anjali Damania: मुंडेंच्या काळात २७५ कोटींचा कृषी घोटाळा; अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप

    Anjali Damania: मुंडे कृषिमंत्री असताना वेगवेगळ्या पाच गैरव्यवहारांत एकूण २७५ कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला. त्यावर मुंडे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर, दमानिया यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत आरोपांचा पुनरुच्चार केला.

    महाराष्ट्र टाइम्स
    damania munde

    मुंबई : मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी कृषी विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. मुंडे कृषिमंत्री असताना वेगवेगळ्या पाच गैरव्यवहारांत एकूण २७५ कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला. त्यावर मुंडे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर, दमानिया यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत आरोपांचा पुनरुच्चार केला.

    मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचे नाव येत असतानाच, धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप दमानिया यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. मंगळवारी दमानिया यांनी पुन्हा मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. मुंडे हे कृषिमंत्री असताना त्यांच्या विभागात तब्बल २७५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारने २०१६ साली शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे देण्याचे आदेश काढले होते. मात्र, कृषिखात्याने या आदेशाला बगल देत शेतीची उपकरणे आणि खतांची खरेदी करताना सर्व नियम धाब्यावर बसवले, असा आरोप दमानिया यांनी केला.
    Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, अंगणवाडी सेविकांना तुमच्या घरात ‘ती’ दिसली तर थेट लाभ रद्द
    मुंडे यांच्या कृषिमंत्री पदाच्या काळात नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅट्री स्पेअर, मेटाल्डे हाइट आणि कापूस बॅगांच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. इफको कंपनीच्या नॅनो युरियाची ५०० मिलीची ९२ रुपयांची बाटली २२० रुपयांना खरेदी करण्याचे टेंडर काढले. नॅनो डीएपची २६९ रुपयांची बाटली ५९० रुपयांना खरेदी करण्यात आली. बॅटरी स्प्रेअरचा बाजारभाव दोन हजार ४९६ रु. असताना तो तीन हजार ४२५ रुपयांना विकत घेतला. या खरेदीसाठी आधी कंत्राटदारांना पैसे दिले आणि त्यानंतर निविदा काढण्यात आली, त्यासाठी मागील तारखेची पत्रे देण्यात आली, असा आरोप दमानिया यांनी केला. या घोटाळ्यातील पैसा निवडणुकीत वापरल्याची शंकाही त्यांनी मांडली.
    Nitesh Rane: मुख्यमंत्रिपदासाठी मातोश्रीने किती उपवास केले? नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार
    ‘युती सरकारच भ्रष्ट’
    मुंबई :
    ‘महाराष्ट्रात २०१४ ते १९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजपा युती सरकार असो, या सकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. एखादा मंत्री नाही, संपूर्ण युती सरकारच भ्रष्ट आहे,’ अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed