• Sun. Aug 2nd, 2026

    Vidarbha Flood: विदर्भात पुरामुळे नऊ जणांचा करुण अंत; मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश, पिकांचे मोठे नुकसान, रस्ते वाहतूक विस्कळीत

    Vidarbha Flood: विदर्भात पुरामुळे नऊ जणांचा करुण अंत; मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश, पिकांचे मोठे नुकसान, रस्ते वाहतूक विस्कळीत

    Vidarbha Flood News: पर्लकोटा आणि पामुलागौतम नद्यांना पूर आल्यामुळे शनिवारी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला पाण्याचा वेढा पडला.

    विदर्भ पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    नागपूर: मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर येऊन दोन दिवसांत विदर्भाच्या विविध भागांत नऊ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलांचाही समावेश आहे. पुराच्या पाण्याचा फटका बसल्याने हजारो एकरांवरील पिकांचे नुकसान झाले असून, काही जिल्ह्यांत रस्ते वाहतूकही प्रभावित झाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात सती नदीत बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यात पुरात वाहून दोघांचा, तर मासे पकडताना एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे धाम नदीत एक युवक वाहून गेला. भंडारा जिल्ह्यात कालव्यात पडून एका शेतकऱ्याचा, तर यवतमाळ जिल्ह्यात नाल्याच्या पुरात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
    Maharashtra TimesPratap Sarnaik: राज्यात लवकरच रुग्णवाहिका धोरण; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
    गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील राणी खेडेगाव येथे शनिवारी दुपारी आई-वडील धान रोवणीच्या कामासाठी शेतात गेले असताना गावातील चार मुले सती नदीवर आंघोळीसाठी गेली. यावेळी नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली होती. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघे खोल पाण्यात गेले आणि बुडाले. चौथा मुलगा सुदैवाने बचावला. लक्ष्मण सुन्हेर दूधकवर (वय ६), कुणाल रमेश दूधकवर (वय ५) आणि मोहित हिवराज सराटे (वय ११) अशी मृतांची नावे आहेत.

    बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील इसापूर येथील फुलकराम जानकीराम काळे (वय ५०) आणि जळगाव शहरातील सिद्धार्थनगरमधील रहिवासी महादेव जगदेव वाघोदे यांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ शिवारात बेंबळा नदीपात्रात मासे पकडताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यात वाहून गेल्याने सूरज तेरसिंग भाबर (वय २६) याचा मृत्यू झाला.

    Maharashtra TimesRaj Thackeray: दरवर्षी अठरा कोटींची दानचोरी; सिद्धिविनायक मंदिराबाबत राज ठाकरेंचा गंभीर आरोप
    वर्धा जिल्ह्यातील पवनार येथील धाम नदी परिसरात पाय घसरून गायमुख कुंडात पडल्याने प्रशांत प्रभाकर माणुसमारे (वय ३५) हा युवक बुडाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

    भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे शेतात जाताना चिखलात पाय घसरून कालव्यातील खड्ड्यात पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद ईश्वर ठाकरे (वय ३०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

    यवतमाळ तालुक्यातील खैरी गावातील एका शेतकऱ्याचा नाल्याच्या पुरात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. मारोती अय्या आत्राम (वय ४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

    Maharashtra TimesTukaram Mundhe : 21 वर्षांपूर्वी अमरावतीत भाषण केलं, प्रेरित होऊन चौथीतली विद्यार्थिनी UPSC उत्तीर्ण झाली, तुकाराम मुंढेंनी सांगितला किस्सा
    पावसाचा जोर ओसरणार
    गेल्या आठवड्यात विदर्भाच्या बहुतांश भागांत दमदार हजेरी लावल्यानंतर पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असली, तरी धरणांच्या पाणीसाठ्यात अद्याप समाधानकारक वाढ झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा