Produced byकोमल आचरेकर | Contributed byमोबिन खान | महाराष्ट्र टाइम्स.कॉम4 Feb 2025, 6:51 pm
साईबाबांच्या साईनगरी शिर्डीत झालेल्या चाकू हल्ल्यात साई संस्थानमध्ये कार्यरत असलेल्या दोन निष्पाप कर्मचाऱ्यांचा बळी गेला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या साईबाबा संस्थानचे सुरक्षारक्षक नितीन शेजुळ यांचा काल ३ फेब्रुवारी रोजी लग्नाचा पंधरावा वाढदिवस होता. त्याची तयारी देखील त्यांनी केली होती. ड्युटी वरून लवकर यायचं आणि पत्नी आणि मुलांसमवेत लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा असा नियोजन करून निघालेले नितीन शेजुळ घरी परतलेच नाही. आणि लग्नाच्या वाढदिवशीच त्यांच्या कुटुंबीयांवर नितीन वर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.