Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प २०२५ सादर झाल्यानंतर बारामतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपण देखील अर्थसंकल्प सादर करणार असल्याचं सांगितलं.
मी अर्थसंकल्प सादर करणार, लाडक्या बहिणी आणि सर्वसामान्य जनता केंद्र बिंदू
महाराष्ट्रातील अर्थसंकल्पावर बोलताना ते म्हणाले, ‘मी देखील अर्थसंकल्प सादर करणार आहे. लाडक्या बहिणी आणि सर्वसामान्य जनता यांना केंद्र बिंदू मानून अर्थसंकल्प सादर करणार आहे. सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत, सहकार चळवळ संपुष्टात आली, तर खाजगीवाले कशीही पिळवणूक करतील. सहकारी संस्था टिकवण्यासाठी डोळ्यात तेल घालून काम करावे लागेल’, असं अजित पवार म्हणाले.
सहकार आणि कृषी, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा, क्रीडा, अल्पसंख्याक विभाग, महिला बालविकास अशी खाती जाणीवपूर्वक आपण घेतली आहेत. साखरेचे भाव वाढले आहेत. काही कारखान्यांना पाऊण लाख किलो साखर विकायला लावली. याबाबत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यंच्याशी बोललो असून ज्यूस टू इथेनॉलला प्राधान्य द्या, जिल्हा परिषद आणि प्राथमिक आरोग्यचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषदेचे शिक्षण सुधारले पाहिजे. बारामतीत उपमुख्यमंत्री कार्यालयातून चार अधिकारी नेमले आहेत. सगळ्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत तर व्यवसाय करा ना, असंही त्यांनी सांगितलं.
Gold Rate Today : अर्थसंकल्पानंतर सोन्याचा दर सर्वोच्च स्तरावर, १० ग्रॅमचा भाव काय? चांदीही वधारली
मी देखील अर्थसंकल्प सादर करणार, लाडक्या बहिणी आणि…; Budget 2025 नंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
बारामती तालुका देशात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न…!
तालुका आणि शहरात सर्व प्रकारची विकासकामे दर्जेदार पद्धतीने करुन बारामती एक आदर्श शहर म्हणून देशात उदयास आलं पाहिजे, बारामती तालुका देशात विकासकामांच्या बाबतीत क्रमांक एकचा तालुका म्हणून करायचा आहे, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. सुमारे ३०० कोटी रुपयांचं पशुवैद्यकीय महाविद्यालयाचं काम करण्यात येणार आहे. तालुक्यात विविध विकासकामं सुरू असून याकरता नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहनही पवार यांनी बारामतीत केलं.

