• Thu. Mar 12th, 2026
    दुर्दैवी! शनीदेवाच्या दर्शनाला निघाले, पण काळाने वाट अडवली; अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू

    Manmad Accident: कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात नस्तनपूर येथे देवदर्शनाला जाणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (दि. ३०) दुपारी नांदगाव-चाळीसगाव मार्गावर हा भीषण अपघात घडला.

    महाराष्ट्र टाइम्स
    car bike accident

    म.टा.वृत्तसेवा, मनमाड: कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात नस्तनपूर येथे देवदर्शनाला जाणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (दि. ३०) दुपारी नांदगाव-चाळीसगाव मार्गावर हा भीषण अपघात घडला. दुचाकीवरील भाऊसाहेब बंडू माळी (वय ४५) व मंगलबाई भाऊसाहेब माळी (वय ४०) अशी अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

    दरम्यान, कारचालक जखमी असल्याने कारबाबत व त्यात कितीजण होते, याबाबत अधिक माहिती अद्याप उपलब्ध झाली नसल्याचे नांदगाव पोलिसांनी सांगितले. अपघातात ठार झालेले पती-पत्नी नांदगाव तालुक्यातील नाग्यासाक्या नजीक पिंपराळे येथील आहेत. नांदगाव-चाळीसगाव मार्गावर पिंपरखेड शिवारातील टोलनाक्यासमोर चाळीसगाव येथून नांदगावकडे जाणाऱ्या कारची (एमएच २० जीके ६४५७) दुचाकीला (एमएच १५ बीआर ७०८५) ला जोरदार धडक बसली.
    Raj Thackeray:…तर अशा निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या; विधानसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले
    हा अपघात इतका भीषण होता की अपघातात दुचाकीवरील भाऊसाहेब बंडू माळी व मंगलबाई भाऊसाहेब माळी हे जागीच ठार झाले, तर दुचाकी चालवत असलेला अमोल भाऊसाहेब माळी (वय २५) तसेच कारचालक असे दोघे जखमी झाले आहेत. दोघांना मालेगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अपघातात दुचाकीचे व कारचे मोठे नुकसान झाले असून, कार अपघातानंतर रस्त्याच्या बाजूला जाऊन पडल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहायक निरीक्षक सुनील बढे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिस कर्मचारी व नागरिक यांच्यासह मदतकार्य केले. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पुढील तपास सुरू आहे.
    Ajit Pawar: खंडणी मागितल्यास ‘मकोका’ लागणार; बीडमध्ये कार्यकर्त्यांना अजित पवारांचा इशारा
    ऊसतोड कामगाराचे दर्शन अपूर्णचऊसाच्या शेतात मजुरी करणाऱ्या सामान्य कुटुंबातील भाऊसाहेब माळी व मंगलबाई माळी या दाम्पत्याला नस्तनपूर येथे शनीदेवाच्या दर्शनाला जाण्याची इच्छा झाली. मुलगा अमोल याला त्यांनी बरोबर येण्यास सांगितले. अमोल दुचाकीवरून आई-वडिलांना घेऊन निघाला. पण त्याचा आई-वडिलांसोबतचा हा प्रवास अखेरचा प्रवास असेल, असे त्याच्या ध्यानीमनीही आले नसावे. त्यांच्यासोबत दुसऱ्या दुचाकीवर आप्तेष्ट होते पण अमोल चालवत असलेल्या दुचाकीला कारने धडक दिली व होत्याचे नव्हते झाले. आई-वडिलांचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याने अमोल सैरभैर झाला. त्यांची छोटीशी झोपडी आई-वडिलांविना त्याच्यासारखीच पोरकी झाली. देवाचे दर्शन घेण्यापूर्वीच काळाने त्याच्या आई-वडिलांना गाठले. दर्शन तर राहिलेच, पण पालक गमावल्याचे दु:ख अमोलला पचवने अवघड जाणार आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed