Chandrashekhar Bawankule: जिल्हाधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी दोन वेळा आपल्या क्षेत्रात दौरा करून आपल्या विभागातील शासकीय ध्येयधोरणे व योजना जनतेपर्यंत पोहोचतात की नाही, याचा वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा, असे निर्देश बावनकुळे यांनी त्यात दिले आहेत.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परिपत्रकाबद्दलची संपूर्ण माहिती दिली. या परिपत्रकात मुख्यमंत्र्यांच्या या संदर्भातील निर्देशांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. या भेटीदौऱ्यांवर देखरेखीसाठी ऑनलाइन प्रणाली तयार करून त्याद्वारे दौऱ्याचे नियोजन करून विभागीय आयुक्त कार्यालयाने या संदर्भात समन्वय राखावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
राज्यात घरे-मालमत्ता महागणार! स्वप्नाच्या घरासाठी आता मोजावी लागतील जास्त पैसे, कारण…
महसूल व वन विभागाच्या या परिपत्रकात क्षेत्रीय भेटींचा १३ कलमी कार्यक्रम अधिकाऱ्यांना आखून देण्यात आला आहे. महसूल अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन, पाहणी करून जनतेशी संवाद साधून जनतेचे अभिप्राय नोंदवावेत, नैसर्गिक आपत्तीप्रवण भागात आपत्ती टाळता येईल का, याबाबत उपाययोजना करून मंत्रालयास सूचना करावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.
ई़डीची मोठी कारवाई; मुंबई, सातारा, रायगडसह उत्तराखंडमध्ये छापेमारी, ७९ कोटींची मालमत्ता जप्त
जिल्हाधिकारी ते कोतवाल अशा सर्व स्तरांवर नियोजन व अंमलबजावणी सुरू ठेवण्यासाठी महसूल यंत्रणा त्यांच्या कार्यक्षेत्रात सक्रिय असली पाहिजे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणा त्यांच्या भागांत फिरतीवर असली पाहिजे, हे यामागचे उद्दिष्ट आहे. विभागीय आयुक्तांनी पाठवलेल्या अहवालावर आपण स्वतः लक्ष देणार असून, त्याची नोंद सेवापुस्तिकेत घेतली जाईल. -चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

