• Mon. Mar 16th, 2026
    आधी तीन महिलांना उडवलं, नंतर पोलिसांकडून पाठलाग; कंटेनरची एकामागे एक तब्बल १५ वाहनांना धडक

    Container Hit 15 Vehicle in Chakan : पुण्यात भीषण अपघात झाला असून कंटेनरने १५ वाहनांना धडक दिली आहे. यात कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

    Lipi

    प्रशांत श्रीमंदिलकर, चाकण, पुणे : अपघाताच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. असाच एक भीषण अपघात पुण्यातील चाकण – शिक्रापूर रस्त्यावर घडला आहे. भरधाव माल वाहतूक कंटेनरने दहा ते पंधरा गाड्यांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

    चाकणमधील माणिक चौकात ही घटना घडली आहे. या घटनेत कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवले, त्यानंतर घटनास्थळावरुन पळून जाण्याच्या हेतूने तो भरधाव वेगात निघाला. मात्र पोलिसांनी ही पाठलाग सुरु केला, स्वतःला वाचवण्याच्या नादात त्याने इतर वाहनांना उडवलं.
    मकर संक्रांत ठरली अखेरची; मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात, तिघांचा मृत्यू, १४ जखमी
    चाकण – शिक्रापूर रोडवर अपघातात आधी चालकाने दोन महिलांना उडवलं. त्यांनतर पुढे मेदनकरवाडी फाटा येथे पाच वर्षाच्या मुलीला उडवलं. पुढे शेल पिंपळगावमध्ये सेलेरो आणि एका गाडीला उडवलं. त्यानंतर पुढे बहुळ गावमध्ये पोलिसांची एर्टिगा, चौफुलामध्ये टाटाएस ही गाडी पलटी होऊन तिच्या खाली बाईकवाली महिला अडकली असल्याची माहिती समोर आली आहे.
    रस्त्यावरील खडीमुळे बोलेरोचं नियंत्रण सुटलं, गाडी थेट ५० फूट विहिरीत कोसळली; चौघांचा भयानक अंत
    रस्त्यावर एका ठिकाणी पोलीसांची टीम त्याला पकडण्यासाठी उभी होती. मात्र त्या पोलिसांच्या वाहनाला देखील या कंटेनर चालकाने उडवलं. त्यामुळे एकच धावपळ, गोंधळ उडाला. मात्र काही अंतर गेल्यावर स्थानिक नागरिकांनी त्याला पकडलं आणी चांगलाच चोप दिला. त्याला शिक्रापुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
    खांद्याला खांदा लावून मी कुठेही उपस्थित असतो, पहाटेचा शपथविधी आठवा; माणिकराव कोकाटेंमुळे भर सभागृहात हशा पिकला
    चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला या परिसरात एकाच माल वाहतूक कंटेनर चालकाने हा प्रताप केला आहे. अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. चालक अकिब खान (वय २४) असं वाहन चालकाचं नाव असून तो हरियाणा येथील राहणारा आहे.

    आधी तीन महिलांना उडवलं, नंतर पोलिसांकडून पाठलाग; कंटेनरची एकामागे एक तब्बल १५ वाहनांना धडक

    जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण वाढत असून अनेक निष्पाप नागरिकांना यात आपला जीव गमवावा लागत आहेत. मद्यपी चालकांना आळा बसवणं आता प्रशासनाचं काम असून त्याची अंमलबजावणी होणं देखील गरजेचं आहे. आजच्या घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून या कंटेनर चालकाला पकडून दिल्याने पुढील दुर्घटना टळली आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *