• Sun. Jun 7th, 2026
    “मी माझ्या वक्तव्यावर ठाम राहणार”! साई भक्तांना हिणवण्याचा प्रयत्न नाही-सुजय विखे

    | Contributed byआशिष मोरे | | Updated: 6 Jan 2025, 12:40 pm

    Sujay Vikhe on shirdi temple food : अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय, महाराष्ट्रातील सगळे भिकारी इथे गोळा झालेत. असे सुजय विखे यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाजातील विविध स्तरांवरुन निषेध करण्यात आला. या आक्षेपावर सुजय विखेंनी प्रतिक्रीया दिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मोबिन खान, शिर्डी : सुजय विखे पाटील यांनी, शिर्डी येथील साई संस्थानाच्या प्रसादालयातील मोफत जेवण बंद करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर, अनेकांनी आक्षेप घेतला. या आक्षेपाबद्दल सुजय विखे यांनी प्रतिक्रीया दिली असुन आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असे ते म्हणाले.
    शिर्डी येथील साई संस्थानाच्या प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा. अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय, महाराष्ट्रातील सगळे भिकारी इथे गोळा झालेत. असे सुजय विखे यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाजातील विविध स्तरांवरुन निषेध करण्यात आला. या आक्षेपावर सुजय विखेंनी प्रतिक्रीया दिली आहे.

    वक्तव्याचा विपर्यास

    माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मराठी भाषेमध्ये प्रत्येकजण वेगवेगळे अर्थ काढतो. साईभक्त आमच्यासाठी आदरणीयच आहेत. साई भक्तांना हिणवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही. परंतु, मोफत जेवणामुळे शिर्डीत अपराधी लोक, मोस्ट वांटेड लोक जे साईभक्त नाहीत त्यांची वाढ होतेय. याचा त्रास ग्रामस्थांना होतोय. मागील ३ वर्षात ४ हजार भिकाऱ्यांना पोलिसांनी अटक करून सुधारगृहात पाठवलय. भिकारी याचा अर्थ भिकारीच जे पोलिसांच्या अहवालात सांगितलं आहे. आणि तेच मी म्हणालो.

    दर आकारल्याने योग्य ते मूल्यमापन केलं जाईल

    शिर्डी विधानसभेत मला माझ्या महिला भगिनी सुरक्षित ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेकरिता मला जे योग्य वाटते ते मी करणारच. साई संस्थानला पुन्हा एकदा माझी विनंती आहे की, प्रसादलायात जेवणाचे १० रुपये दर आकारल्याने योग्य ते मूल्यमापन केलं जाईल. तसेच संस्थानच्या प्रसादलयातील आकारलेल्या पैशांचा वापर विकासासाठी आणि शिक्षणासाठी व्हावा. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    शिर्डीची रचना शिर्डी ग्रामस्थांनी केलीये. ज्या भागामध्ये मी राहिला आलो त्या भागाचा विकास व्हावा अशी भावना साईबाबांच्या मनात होती. साईबाबा आले तेव्हा शिर्डीचे ग्रामस्थ साईबाबांसमवेत होते. मी माझ्या वक्तव्याशी ठाम राहणार, या वक्तव्याने कुठल्याही साईभक्ताला हिणवण्याचा माझा उद्देश नाही. परंतु, पोलिसांची आकडेवारी जे सांगते त्यावरुन भिकारी हा शब्द तंतोतंत लागू होतो.

    जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील याबाबत साई संस्थान प्रशासनासमवेत मीटिंग घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मी साईबाबा संस्थानच्या प्रसादलयात गेल्यानंतर पन्नास रुपये भरून जेवण करतो. अशी प्रतिक्रिया माजी खा.सुजय विखे पाटलांची होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed