• Sun. Sep 6th, 2026

फडणवीसांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलंय?, बीड प्रकरणावरुन राऊतांचा आरोप

फडणवीसांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलंय?, बीड प्रकरणावरुन राऊतांचा आरोप

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jan 2025, 11:59 am

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत बीड प्रकरणावरुन भाष्य केलं. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना सोडलं आहे? किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलं आहे? किती जणांचे आक्रोश आणि किंकाळ्या दाबल्या आहेत? याबाबत एसआयटी स्थापन केली पाहिजे. बीडच्या हत्या प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस गंभीर आहेत असं कळलं आहे. कारण शेवटी ही महाराष्ट्राची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी.एक वाल्मिक कराडला अटक केली. पण बीडमध्ये हा खटला चालवू नये अशी माझी मागणी आहे. हा इतका गंभीर विषय आहे की हा खटला बीडच्या बाहेर चालला पाहिजे. महाराष्ट्रात कुठेही खटला चालला तरीही न्याय मिळण्याची शक्यता नाही…तरीही मानतो की मुख्यमंत्र्यांवर सध्या तरी विश्वास ठेवू, असंही यावेळी राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed