• Sat. Sep 21st, 2024

पाच वर्ष माय बापाला भेटत नाहीस, मतदाराला काय भेटशील… संजय जाधवांनी पुन्हा जानकरांना डिवचलं

पाच वर्ष माय बापाला भेटत नाहीस, मतदाराला काय भेटशील… संजय जाधवांनी पुन्हा जानकरांना डिवचलं

डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : एकीकडे महायुतीचे उमेदवार संविधान बदलायची भाषा करत आहेत आणि दुसरीकडे सांगत आहेत की मी पाच पाच वर्षे माय बापाला भेटत नाही… पाच पाच वर्षे तू माय बापाला भेटत नसशील तर मतदारांना काय भेटशील बाबा…. यांना परभणीतच उमेदवारी का दिलीये? परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीकडे एकही माणूस नव्हता का? साताऱ्याच्या माणसाला उमेदवारी ही आमच्यासाठी मोठी शोकांतिका आहे. उद्या आम्ही छोट्या मोठ्या कामांसाठी साताऱ्याला जाणार आहोत का? आम्ही तुमच्या रक्तामासाचे आहोत जेव्हा जेव्हा तुमच्यावर प्रसंग येईल तेव्हा आम्ही अर्ध्या रात्री धावून येऊ, अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यावर केली.

परभणीच्या जिंतूर येथे महाविकास आघाडीच्या वतीने प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार विजय भांबळे, माजी आमदार संतोष टारफे, सुरेश नागरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
तू कितीही जातीवाद कर, महायुतीचे मराठा नेते माझ्यासोबत, मी अडीच लाखांनी जिंकणार, जानकरांचे बंडू जाधवांना उत्तर

पुढे बोलताना संजय जाधव म्हणाले की, परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून केवळ बाहेरचाच उमेदवार लादला नाही तर या लोकसभा मतदारसंघातील जाती-जातीमध्ये भांडणे लावून देण्याचे काम देखील केले जात आहे. सुखाने नांदत असलेला समाज जाती जाती तोडण्यासाठीचा प्रयत्न महादेव जानकर नाही तर भाजपा करत आहे. भाजपने जातीजातीच नव्हे तर घराघरात देखील भांडणे लवली आहे. माझ्या घरात देखील भांडणे लावण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे. माझा भाऊच माझ्या विरोधात काय काय करत आहे पण मी त्याला भीक घालत नाही. कर नाहीतर डर कशाला, अशा शब्दात संजय जाधव यांनी भाजपला लक्ष्य केले.
परभणीत ‘मराठा कार्ड’, सुभाष जावळे लोकसभेचे उमेदवार, चौरंगी लढत होणार

महायुतीच्या उमेदवाराला मतदान आम्ही का करायचं?

बाहेरच्या देशातून काळे धन आणले म्हणून आम्ही मतदान करायचं का? प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकले म्हणून मतदान करायचं का? शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव दिला म्हणून मतदान करायचे का? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले म्हणून मतदान करायचे का? दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ म्हणून बेरोजगार करणाऱ्या सरकारला मतदान करायचे का? असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी भाजपसह मित्र पक्षांवर जोरदार टीका केली.एकही आश्वासन पूर्ण न करणाऱ्या भाजप सरकारला पुन्हा सत्तेत बसवण्याचे आपण काम करणार का? अशी विचारणही त्यांनी उपस्थित नागरिकांना केली.
परभणीत संजय जाधवांना खासदारकीच्या हॅट्ट्रिकची नामी संधी, शिवाजीराव देशमुखांची बरोबरी करणार?

राज्यामध्ये जेव्हा भाजप शिवसेना सरकार होते, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी दीड लाख रुपयांची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती पण ती सर्व शेतकऱ्याला मिळाली नाही पण त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरसकट दीड लाख रुपयाची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली. ज्या सरकारी नोकऱ्या द्यायच्या होत्या त्या सर्व कंपन्या या सरकारने खाजगी उद्योजकांना विकून टाकल्या, अशी टीका संजय जाधव यांनी केली.

देशाची सेवा करण्यासाठी स्वतःचं घर घेतलं नाही, लग्न केलं नाही | महादेव जानकर

या प्रचार सभेला जिंतूर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जसा जसा प्रचार जोमात सुरू आहे, तसं तसं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. बुधवारी परतूर येथे महादेव जानकर यांनी संजय जाधव यांच्यावर केलेल्या आरोपांना जाधव यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed