• Sun. Mar 15th, 2026
    सातारकरांची तहान भागणार? उरमोडी धरणात २० टक्केच पाणीसाठा, तर इतर धरणांनी गाठला तळ

    म. टा. वृत्तसेवा, सातारा : महाराष्ट्राची वरदायिनी म्हटले जाणारे कोयना धरण सातारा जिल्ह्यात असूनही यंदा पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कोयनेतील पाणीसाठा ५३ टीएमसी असा समाधानकारक असला, तरी इतर धरणांनी तळ गाठला आहे. सध्या प्रमुख सहा धरणांत ६९ टीएमसी साठा असून, तो गेल्या वर्षी पेक्षा कमीच आहे.जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी, अशी प्रमुख धरणे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पर्जन्यमान अधिक होते. त्याच भागात ही धरणे असल्याने दरवर्षी ओसंडून वाहतात; पण गेल्या वर्षी संपूर्ण जिल्ह्यातच पाऊस कमी झाला होता. त्यामुळे बहुतांशी धरणे भरली नाहीत. पाऊस कमी झाल्याने गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या उरमोडी धरणात तर सुमारे २० टक्केच पाणीसाठा राहिला आहे.
    एपीएमसीत पिवळ्या धम्मक कलिंगडांची नवलाई, ग्राहकांकडून संमिश्र मागणी
    कोयना धरणाच्या पाण्यामध्ये सांगली जिल्ह्याचा वाटा अधिक आहे. त्यामुळे सांगलीसाठी मागणीनुसार सिंचनाकरिता पाणी विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरू आहे. त्यातच दुष्काळी स्थिती असल्याने आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होण्याची भीती आहे. त्यामुळे पुढील दोन महिने पाणी पुरवून वापरण्याचे आव्हान नागरिक आणि प्रशासनासमोर आहे.

    जिल्ह्यातील धरण पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

    धरण – एकूण क्षमता – यंदाचा साठा

    धोम – १३.५० – ६.३७

    कण्हेर – १०.१० – ३.४८

    कोयना – १०५.२५ – ५२.९६

    बलकवडी – ४.०८ – १.२४

    उरमोडी – ९.९६ – १.९९

    तारळी – ५.८५ – ३.३३

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed