• Sat. Sep 21st, 2024

दीर्घ पल्ला कमी वेळेत गाठण्याचे कसब; चाच्यांविरोधात सामना, गस्ती युद्धनौकांची उल्लेखनीय भूमिका

दीर्घ पल्ला कमी वेळेत गाठण्याचे कसब; चाच्यांविरोधात सामना, गस्ती युद्धनौकांची उल्लेखनीय भूमिका

मुंबई : भारतीय नौदलाकडून १०० दिवसांहून अधिक काळापासून अरबी समुद्रात ‘ऑपरेशन संकल्प’ अंतर्गत सोमाली चाच्यांचा सामना सुरू आहे. त्यात २१ युद्धनौकांचा समावेश असला, तरी एरव्ही फार चर्चेत नसलेल्या गस्ती युद्धनौकांनी बजावलेली भूमिका उल्लेखनीय ठरत आहे. दीर्घ पल्ला कमीत कमी वेळेत गाठू शकण्याचे तांत्रिक कसब असल्याने या श्रेणीतील युद्धनौका एडनच्या आखाताच्या दक्षिणेला मोलाची सेवा देत आहेत.भारतीय नौदलाच्या १२पेक्षा अधिक युद्धनौका ‘ऑपरेशन संकल्प’मध्ये सहभागी झाल्या आहेत. अलीकडेच ३५ सोमाली चाच्यांना पकडून आणणारी ‘आयएनएस कोलकाता’ ही त्यातीलच एकच आघाडीची विनाशिका. मात्र, या विनाशिका आणि फ्रिगेट्सना वेळोवेळी तातडीने कवच देण्याचे व वेळप्रसंगी स्वत: चाच्यांविरुद्धच्या मोहिमेचे नेतृत्व करण्याचे काम गस्ती नौका करीत आहेत.
अल्पसंख्येमुळे सरकारकडून पारलिंगी गटाच्या मागण्या दुर्लक्षित, महाराष्ट्रात ‘इतके’ पारलिंगी मतदार
कमी वजनामुळे अधिक वेग, हे मोहिमेतील गस्ती युद्धानौकांच्या यशाचे गमक असल्याचे नौदलातील सूत्रांनी सांगितले. ‘या युद्धनौका १८०० ते २२०० टन वजनासह मोहिमेतील विनाशिका व फ्रिगेटच्या तुलनेत निम्म्याहून कमी वजनी आहेत. त्यामुळेच ताशी २५ सागरी मैल म्हणजेच ४६ किमी प्रति तास, हा वेग गाठण्यासाठी त्यांना आघाडीच्या युद्धनौकांच्या तुलनेत कमी कालावधी लागतो. समुद्री चाच्यांविरुद्धच्या मोहिमेत आघाडीच्या युद्धनौकांच्या मदतीसाठी या गस्ती नौका तातडीने धावून आल्याचे अनेकदा घडले. त्यामुळेच या युद्धनौकांची नेमकी उपयुक्तता या मोहिमेच्या निमित्ताने अधोरेखित झाली,’ असे नौदल सूत्रांचे म्हणणे आहे.

या गस्ती युद्धनौकांची कामगिरी

समुद्री चाच्यांविरुद्धच्या मोहिमेत डिसेंबरपासून मुंबईत गृहतळ असलेल्या ‘आयएनएस सुभद्रा’ व ‘आयएनएस सुकन्या’सह चेन्नई गृहतळावरील ‘आयएनएस सुमित्रा’ तसेच पोर्ट ब्लेअर तळावरील ‘आयएनएस सुमेधा’ या चार युद्धनौकांची कामगिरी मोलाची ठरली.

पाकच्या मच्छिमारांकडून भारताचा जयजयकार

सोमाली चाच्यांनी शुक्रवारी दुपारी आणखी एका मच्छिमार नौकेचे अपहरण केले होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर ‘आयएनएस त्रिशूल’ या युद्धनौकेने सामना सुरू केला. त्याचवेळी ‘आयएनएस सुमेधा’ तातडीने मदतीला पोहोचली आणि १२ तासांच्या लढ्यानंतर नऊ चाच्यांनी शरणागती पत्करली. त्यांना भारतात आणले जाणार आहे. या कारवाईत २३ पाकिस्तानी मच्छिमारांची सुटका करण्यात आली. त्यांनी भारताचा जयजयकार केल्याचे नौदलाच्या व्हिडिओत समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed