• Sat. Sep 21st, 2024

शिव’तारे जमीन पर’; एक फोन अन् बापूंना साक्षात्कार; तो कॉल कोणाचा? शिवतारेंनी सगळंच सांगितलं

शिव’तारे जमीन पर’; एक फोन अन् बापूंना साक्षात्कार; तो कॉल कोणाचा? शिवतारेंनी सगळंच सांगितलं

पुणे: अजित पवारांना प्रचंड गुर्मी, बारामतीत लोकशाहीसाठी लढणार, मतदारसंघात साडे पाच लाख पवारविरोधी मतदान, त्यांच्यासाठी मी निवडणूक लढवणार, असं म्हणत पवार कुटुंबाविरोधात आक्रमक भूमिका घेणारे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारेंनी अखेर तलवार मान्य केली आहे. आपण बारामती लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा त्यांनी केली. महायुती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येऊ नयेत म्हणून माघार घेत असल्याची सारवासारव शिवतारेंनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

बारामतीचा सातबारा पवार कुटुंबाच्या नावावर आहे का? बारामतीत यंदा पवार विरुद्ध पवार लढाई आहे. मतदारसंघात असलेल्या साडे पाच लाख पवारविरोधी मतदारांनी काय करायचं, त्यांच्यासाठी मी निवडणूक लढवणार आहे, असं शिवतारे गेल्या २० दिवसांपासून सांगत होते. पक्षानं कारवाई केली तरी मी निवडणूक लढवणार. फासावर दिलं तरी मी लढणार, असं मोठ्या आवेशात सांगणाऱ्या शिवतारेंचा सूर अगदी मावळला. गेले २० दिवस पवारविरोधी सूर आळवणाऱ्या, पवारांच्या कपटी राजकारणाची यादी वाचणाऱ्या शिवतारेंनी आज मात्र महायुतीच्या होणाऱ्या संभाव्य नुकसानाची यादी वाचली.
५ ते ७ वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता! अर्चना पाटील भाजपमध्ये; फडणवीसांनी घटनाक्रम सांगितला
काय काय म्हणाले शिवतारे?
महिन्याभरापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात मी बारामतीतून लढण्याची भूमिका मांडली. गेले १५ दिवस मी त्यावर ठाम होतो. कार्यकर्ते कामाला लागले. भोर, इंदापूर, पुरंदर, दौंड, खडकवासल्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. या दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंशी दोनदा चर्चा झाली. पण तरीही मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो. त्यामुळे मुख्यमंत्री माझ्यावर रागावले, असा घटनाक्रम शिवतारेंनी सांगितला.
भाजपनं ठाण्यावरुन ताणलं तर…; शिंदेगटाचं ठरलं, श्रीकांत शिंदेंची उमेदवारी लटकली
मुख्यमंत्री शिंदे यांचे ओएसडी खतगावकर यांचा मला फोन आला. तुमच्यासारखी भूमिका इतर मतदारसंघांमधील नाराज नेत्यांनी घेतली आणि सगळेच जण अपक्ष उभे राहिले तर काय होईल? तुमच्यामुळे राज्यभर चुकीचा मेसेज जाईल. सगळीकडे बंडखोरी झाल्यास महायुतीचे १० ते २० उमेदवार पडतील. तुम्ही घेतलेल्या पवित्र्यामुळे महायुतीची, शिंदे साहेबांची अडचण होत असल्याचं खतगावकर यांनी मला सांगितलं. त्यानंतर मी क्षणार्धात माघारीचा निर्णय घेतला, असं शिवतारेंनी सांगितलं.

शिंदे-फडणवीस, अजितदादांच्या भेटीनंतर शिवतारेंची तलवार बोथट, आज वाद मिटण्याची शक्यता

मुख्यमंत्र्याचे ओएसडी असलेल्या खतगावकरांनी मला महायुतीची झालेली अडचण सांगितली. त्यामुळे मी माघार करण्याचा निर्णय घेतला. माझ्यामुळे महायुतीचं नुकसान होण्याची शक्यता होती. तो प्रमाद माझ्या हातून घडायला नको. तसं झाल्यास तो प्रमाद इतिहासात लिहिला गेला असता. त्यामुळे मी तह केला. इतिहासात पुरंदरच्या तहाला वेगळं महत्त्व आहे, असं म्हणत बापूंनी त्यांच्या निर्णयाला तात्त्विक मुलामा देण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed