• Sun. Mar 8th, 2026
    सिंचन घोटाळ्याच्या चिखलात सुनील तटकरे रुतले आहेत, रोहित पवारांचा हल्लाबोल

    रायगड: स्वाभिमान सोडून जे आज प्रतिगामी शक्तींसोबत गेले आहेत, त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत नापास करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केले आहे. इंडिया आघाडीने रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे अनंत गीते यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार दिला आहे, तर दुसरीकडे सिंचन घोटाळ्याच्या चिखलात सुनील तटकरे रुतले आहेत, असा घणाघात रोहित पवार यांनी केला.
    शिवसेना खासदारांचे पीए फोन उचलत नाहीत, नीट बोलत नाहीत, महायुतीतील खदखद चव्हाट्यावर
    भविष्यात भाजपच्या कमळामध्ये कोणी पहिली उडी मारेल, तर ते सुनील तटकरे असतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले. हिरोजी इंदुलकरांनी रायगड किल्ला बांधताना स्वतःचे घर गहाण टाकले होते. मात्र तटकरे यांनी स्वतःच्या घरासाठी खोट्या १०० कंपन्या काढल्याचे टीकास्त्र पवार यांनी डागले. गीतेंनी आतापर्यंत मंत्रीपदे भूषवली आहेत. मात्र, त्यांनी त्या पदाचा कधीच दुरूपयोग केला नाही अथवा भ्रष्टाचार केला नाही. सुनील तटकरे हे निवडून येण्यासाठी सर्वांच्याच पाया पडतील. त्यांना त्यांची जागा या निवडणुकीत दाखवा. एकदा का ते निवडून आले की ते मदत करणाऱ्यांना हमखास विसरतात, असेही रोहित पवार म्हणाले.देशात आणि राज्यात इंडिया आघाडीसाठी अत्यंत चांगले वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीची लाट येणार असल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. भाजपने राज्याची आणि मुंबईची ताकद कमी करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आएफसी सेंटर, हिरे व्यापार यासह अन्य प्रकल्प गुजरातला नेले आहेत. रायगडात येऊ घातलेल्या बल्क ड्रग्ज पार्कसाठी स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेतले पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले.

    एबी फॉर्मशिवाय शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला, प्रतापरावांबाबत भविष्यवाणी करू शकत नाही | संजय गायकवाड

    दिल्ली अथवा राज्यातील सत्तेत असताना शरद पवारांनी नेहमीच महिला, शेतकरी, कष्टकरी, युवा, बेरोजगार, शेती उद्योग यांना प्राधान्य दिले आहे. यासाठी त्यांनी राज्यात नेत्यांची फळी निर्माण केली होती. त्यातील काहीजण सोडून गेल्याने काही फरक पडत नाही. कारण गेलेल्यांकडे निष्ठा, विचार नाही. त्यामुळे विजय आपलाच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमच्या घराण्यावर देखील शेकापचेच संस्कार झाले असल्याचेही रोहित पवारांनी सांगितले. सुनील तटकरे यांनी याआधी काँग्रेसचे बॅ. ए. आर. अंतुले, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फसवले आहे. त्यांच्याकडे विचार, निष्ठा नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed