• Sun. Mar 8th, 2026
    Amravati Lok Sabha: बच्चू कडू थेटच बोलले; आम्ही डूबलो तरी चालेल पण…, सागर बंगल्यावर येऊन…

    अमरावती: महायुतीतील जागावाटपाची चर्चा अद्याप संपली नसताना प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारीची घोषणा केल्यानंतर बच्चू कडू यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

    नवनीत राणा यांच्याविरोधात लढण्याचा निर्णय हा फक्त अमरावती पुरता आहे. अमरावतीमध्ये आमचे दोन आमदार आहेत तेव्हा आमच्याशी चर्चा करायला हवी होती, पण ती तसदी कोणी दाखवली नाही. त्यामुळे आम्ही डूबलो तरी चालेल पण स्वाभिमान गेला नाही पाहिजे, मार जायेंगे कट जायेंगे, लेकीन ताकद से लढेंगे, असे कडू म्हणाले.

    सागर बंगल्यावर येऊन आम्ही शमणार नाही, आम्ही सागराच्या लाटा

    सागर बंगल्यावर येऊन बच्चू कडू यांचे बंड शमेल असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले होते. राणे यांच्या या वक्तव्याचा कडू यांनी समाचार घेतला.राणे शमले असतील त्यांची रक्ततपासणी केली पाहिजे. आम्ही शमणारे नाहीत, आम्ही सागरातील लाटा आहोत, हे राणेंना माहीत नाही. राणेंनी उगाच मिठाचा खडा टाकू नये. आम्ही अमरावतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहोत. छेडावे वाटत असेल तर आमची काही हरकत नाही असे म्हणत कडू यांनी इशारा दिला.
    Breaking News: अमरावतीत बच्चू कडूंचा महायुतीला धक्का; ‘प्रहार’ मधून दिनेश बुब यांना उमेदवारी

    त्यांना वाटत असेल तर युतीतून बाहेर जाऊ

    मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले हे आम्ही कधीच विसरणार नाही. त्यामुळे त्यांचा फोन आल्यावर भेटायला गेलो होतो. भाजपाला किंवा शिंदे यांना कुणाला वाटत असेल आम्ही युती धर्म पाळला नाही. त्यांना कारवाई करावी वाटत असेल तर करावी. त्यांची इच्छा नसेल तर युतीतीन बाहेर जायला आम्हाला काही अडचण नाही, असे कडू म्हणाले.

    तुमच्याविरोधात जर काही कारवाई केली तर? असा प्रश्न विचारला असता बच्चू कडू यांनी कडक इशारा दिला. कारवाई करायला आम्ही आंडूपांडू वाटतोय का? अशी प्रतिक्रिया कडू यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed