• Thu. Jul 23rd, 2026
    काँग्रेसच्या बड्या नेत्याची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाण यांची मध्यस्थी!

    ऋषी होळीकर, लातूर : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत. पुढील काही दिवसांत त्या भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी नुकतेच काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेले अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे.

    मागील पाच वर्षांपूर्वीच डॉ. अर्चना चाकूरकर भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या. मात्र काही कारणांमुळे ते त्यांनी प्रवेश करणे टाळले. मात्र यावेळी त्यांचे सासरे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र माजी आमदार बसवराज पाटील हे भाजपामध्ये डेरेदाखल झाले आहेत. त्यापूर्वी अशोक चव्हाणही भाजपमध्ये गेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपमध्ये जातील, अशी माहिती आहे.

    अल्पसंख्यांक समाजातील बरीचशी मंडळी माझ्यासोबत यायला तयार, बिलकूल या चिंता करु नका : अशोक चव्हाण

    लातूर जिल्ह्यात लिंगायत समाजाचे वर्चस्व आहे. याच समाजातून डॉ. अर्चना चाकूरकर येतात. लातूरमधील स्थानिक समीकरणे डोळ्यासमोर ठेवून भाजप त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवू शकते, अशी चर्चा आहे. तसेच लिंगायत समाजाचा चेहरा म्हणून त्यांना प्रोजेक्ट केले जाऊ शकते.अर्चना पाटील यांनी राजकारणात सक्रिय व्हावे, यासाठी पाटील समर्थकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
    राजकारण: लातूरमध्ये कुणाचे पारडे जड? राखीव मतदारसंघात एकदा काँग्रेस तर दोनदा भाजपचा विजय, यंदा वारं कुणाचं?

    ८० वर्षे वय असलेले शिवराज चाकूरकर सध्या निवृत्तीच्या मन:स्थितीत आहेत. लातूर जिल्ह्यात लिंगायत समाज मोठ्या संख्येने असून चाकूरकरांच्या रूपाने या समाजाला मोठा आधार होता. मात्र आता चाकूरकर निवृत्त होत असताना आपला एक कणखर प्रतिनिधी असावा, अशी लिंगायत समाजातील जनतेची मानसिकता आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात चाकूरकरांना अर्चना पाटील यांच्या राजकारण प्रवेशाबाबत छेडले असता त्यांनी मला कुणी विचारले तर मी नाही म्हणणार नाही’ असे सूचक उत्तर दिले होते. येत्या काही दिवसात त्यांचा प्रवेश होणार आहे अशी चर्चा जिल्हाभरात होत आहे.

    Crime News: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला!
    कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ मिळणार – मंत्री बाबासाहेब पाटील – महासंवाद
    सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed