यावेळी बोलताना लोखंडे पुढे म्हणाले, शिर्डीच्या जनतेने आणि युतीच्या कार्यकर्त्यांनी मागील दोन्ही निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून दिले. मला मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कामाला लागा असे आदेश दिलेत. २०२३ ला शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणू शकलो. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कामे केली. रखडलेली अनेक कामे मार्गी लावली असल्याचे म्हणत मला ४० वर्षांचा राजकीय अनुभव असून मला केंद्रात साईबाबांच्या नगरीतला खासदार म्हणून ओळखतात. साई बाबांच्या नावाचा उपयोग १८२ गावांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. मी निवडणुकीत चपटी आणि पाकीट वाटले नाही तरी जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला असल्याचे देखील लोखंडे म्हणाले.
दहा कोटी नाकारणारा पाहिजे की दहा लाख खाणारा?
तुपामध्ये पैसे खाणारा खासदार पाहिजे का? हे जनतेने ठरवायचंय. वाकचौरेंची ३२ वर्ष प्रशासकीय सेवा झाली. माझी 40 वर्ष जनतेत सेवा आहे. दिल्लीतील स्टिक ऑपरेशनमध्ये मी दहा कोटी रुपये नाकारले होते आणि साईबाबा संस्थानच्या घोटाळ्यात ‘त्यांनी’ दहा लाख खाल्ले. मी त्यांच्यापेक्षा बरा असून लोकांना दहा कोटी नाकारणारा पाहिजे की दहा लाख खाणारा? असा सवाल देखील लोखंडे यांनी उपस्थित करत वाकचौरेंवर टीका केली.