• Sat. Sep 21st, 2024
लोकसभा निवडणुकीवरच पक्षाचं आणि तुमचं अस्तित्व, मुख्यमंत्र्यांची आमदार खासदारांना वॉर्निंग

मुंबई : लोकसभा निवडणूक ही विधानसभेची नांदी आहे. यावरच पक्षाचे आणि तुमचे अस्तित्व राहणार आहे, अशी ताकीद देत त्यादृष्टीने कामाला लागा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या सर्व आमदार, खासदारांना दिल्या. महायुतीत लढत असताना मित्रपक्षांना सगळ्यांनी मदत करा, आडमूठी भूमिका घेऊ नका, कारण आपल्या उमेदवारांना देखील मित्रपक्ष मदत करणार आहेत. लोकसभेत पक्षाची सर्वोत्तम कामगिरी कशी होईल याकडे लक्ष द्या, पुढील दोन महिने डोळ्यात जातीने लक्ष देऊन काम करा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.शिवसेना पक्षाची लोकसभा निवडणूक आढावा बैठक मुंबईमधील वरळीच्या सरदार वल्लभभाई पाटील डोममध्ये संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी विविध मतदारसंघाचे निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, माजी नगरसेवक, प्रवक्ते, मंत्री तसेच आमदार खासदारांची बैठक घेऊन निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

विरोधक खालच्या पातळीवर टीका करत आहेत. पण आपण पातळी सोडायची नाही. शिव्याशाप द्यायचे नाही. विरोधकांना एक्सपोज करा, अशा सूचना करतानाच आपण महायुती म्हणून लोकसभा निवडणुकांना सामोरे जातोय, त्यामुळे पक्षाची जी भूमिका आहे त्याच्या विरोधात कुणालाही जाता येणार नाही, महायुतीतील घटकपक्षांना सहकार्याची भूमिका ठेलवा. शेवटी लोकसभा निवडणूक ही विधानसभेची नांदी आहे. यावरच पक्षाचे आणि तुमचे अस्तित्व राहणार आहे, अशी सक्त ताकीदच मुख्यमंत्र्यांनी आमदार-खासदारांना दिली आहे.
Ramdas Athawale Car Accident : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. बाळासाहेबांचे विचार सोडले. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या शिवाजी पार्कमधील समारोपीय भाषणात ठाकरेंना हिंदू बांधव भगिनी म्हणायची लाज वाटली. २०१९ साली ठाकरेंनी जनमताचा आदर करून महाविकास आघाडीची स्थापना केली. बाळासाहेबांच्या इच्छेविरूद्ध ते वागत आहेत, हे मुद्दे लोकांसमोर मांडण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
भाजपवर मोठी नामुष्की, माढ्यात जाहीर केलेली उमेदवारी मागे घेणार, सातारची दादांची जागा भाजपला!

लोकांसमोर जात असताना केवळ राजकारण घेऊन जाऊ नका. आपल्या सरकारने केलेल्या कामांची यादी त्यांच्यासमोर ठेवून लोकांची मने वळवा. ५०/६० वर्षात कॉंग्रेसने काय केलं आणि गेल्या १० वर्षात काय झालं हे लोकांसमोर मांडा. अडीच वर्ष सरकार घरी बसलं होतं. गेल्या दोन वर्षात आपलं शासन लोकांच्या दारी गेलंय हे आवर्जून सांगा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मोदी उभे राहिले तरी प्रचार करणार नाही; रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तिकीट, शिंदे सेनेचा जय महाराष्ट्र

आपण मराठा आरक्षण दिले. न्यायालयीन पातळीवर टिकणारे आरक्षण दिले आहे.पोलिस भरती या आरक्षणानुसार होत आहेत. मराठा समाजाला न्याय दिला पण तो देत असताना ओबीसींवर कोणताही अन्याय केला नाही हे लोकांच्या मनावर ठसवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आमदार-खासदारांना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed