• Sat. Sep 21st, 2024

पवार कुटुंब अभेद्य! शरद-अजित पवार एकत्र येतील: सरोज पाटील; चंद्रकांत पाटलांना टोला, कावळ्याच्या शापाने…

पवार कुटुंब अभेद्य! शरद-अजित पवार एकत्र येतील: सरोज पाटील;  चंद्रकांत पाटलांना टोला, कावळ्याच्या शापाने…

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड करत आपली वाट महायुती सोबत पकडली. यामुळे पवार कुटुंबामध्ये देखील उभी फुट पडली. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना होण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांना त्यांच्याच घरातून आता विरोध होत आहे. मात्र पवार कुटुंब अभेद्य असून भविष्यकाळात अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी व्यक्त केला आहे.तसेच कावळ्याच्या शापाने गुरु मरत नसतो, असा टोलाही त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. त्या आज कोल्हापूरात पत्रकारांशी बोलत होत्या.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत महायुतीमध्ये सामील झाले.यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असे ननंद भावजय असा हायव्होल्टेज सामना रंगणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.तर अजित पवार यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे कुटुंबात देखिल एकटे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर आता शरद पवारांच्या बहिण आणि ज्येष्ठ नेते दिवंगत एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी शरद पवारांची पाठराखण केली आहे.आमच्या कुटुंबात कोणतेही मतभेद नाहीत.आणि राज्याच्या राजकारणाची जाण असलेल्या शरद पवार मागे महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा राहील.भविष्यकाळात अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील असा विश्वास मला विश्वास आहे, असे सरोज पाटील म्हणाल्या.

श्रीमंत शाहू महाराजांसाठी अंनिस मैदानात

तर कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदार संघात श्रीमंत शाहू महाराज यांना उतरवत आहे त्यांचे तिकीट जवळपास निश्चित झाले असून केवळ औपचारिकता बाकी आहे.या संदर्भात देखील सरोज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून कोल्हापूर जिल्ह्यातील लोक सुज्ञ आहेत.त्यांना कोणाला निवडून द्यायचं ते सांगावं लागत नाही. कोल्हापूरचे लोक शाहू महाराजांना निवडून देतील.यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही आम्ही सूचना दिल्या असल्याचे सरोज पाटील म्हणाल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाची पुन्हा सत्ता नको असेल तर जनतेनं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे अस आवाहन हे सरोज पाटील यांनी केलं.

मंत्री चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार

तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करायचा आहे. असं वक्तव्य केलं होत.या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जोरदार टीका करण्यात आली. मात्र आता या वक्तव्यावर सरोज पाटील यांनीही भाष्य केल असून, खोटेनाटे आरोप करून देवाला साकडं घाला,राम मंदिराला जावा मात्र शरद पवारांचा पराभव करणे शक्य नाही.पवारांचे काम लोक जाणतात त्यामुळे कावळ्याच्या शापाने गुरु मरत नाही, असा टोलाही सरोज पाटील यांनी मंत्री चंद्रकांतदादांना लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed