• Mon. Mar 9th, 2026

    महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजवा,अमोल कोल्हेंची निलेश लंकेंना साद

    महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजवा,अमोल कोल्हेंची निलेश लंकेंना साद

    अहमदनगर :निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने ऐतिहासिक महानाट्य शिवपुत्र संभाजी नाटकाचं आयोजन १ मार्च ते ४ मार्चपर्यंत करण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी लाखोच्या संख्येनं शिवभक्तांनी गर्दी केली होती. तसेच वेगवेगळ्या पक्षातील अनेक आमदार, माजी आमदार, नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी यांनी या महानाट्याच्या मंचावर चार दिवस गर्दी केली होती. छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता इतिहास नगरकरांना याची देही याची डोळा पाहायला मिळाला. ढाल तलवारी घेऊन होणारे युद्ध, जनसमुदायांमधून घोड्यावर धावणारे छत्रपती संभाजी महाराज हा अनुभव डोळ्याचे पारणे फेडणारा होता. शेवटच्या दिवशी ४ मार्चला हे महानाट्य संपल्यानंतर महानाट्यातील प्रमुख भूमिका करणारे अभिनेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जनतेशी संवाद साधला.खासदार अमोल कोल्हे म्हणाले की “लोकनेते माझे जवळचे मित्र ज्यांच्या समाजिक कार्याचा मला नेहमी अभिमान वाटतो. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातील मानसं जनतेच्या काळजावर अधिराज्य गाजवतात त्यावेळी अभिमान वाटतो. नगरकरांचे मनापासून आभार उदंड प्रतिसाद दिला, कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करतो. लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करतो कारण तुम्ही लाखोंच्या गर्दीच नियोजन केलं, असं अमोल कोल्हे म्हणाले.
    शिरुरमध्ये जिंकणार जरुर, आढळरावांना विश्वास; पण शिंदेंची साथ सोडून नव्या पक्षप्रवेशाची तयारी?
    पत्रकार विचारतात सातत्यानं गेले काही दिवस विरोधक मला घेरण्यासाठी शिरुरला येत असताना, राजकीय घडामोडी घडत असताना मी नगरला कसा असा प्रश्न मला सतत विचारला जातो. पद राजकारण सगळं बाजूला छत्रपती सर्वोच्च आहेत. आपल्याला फक्त जयजयकार करुन चालणार नाही, हा इतिहास काय प्रेरणा देतो याचा विचार केला पाहिजे, असंही ते म्हणाले.
    …म्हणून दोनशे आमदार असूनही महायुतीला उमेदवार सापडत नाही, अमोल कोल्हेंचा निशाणा
    गेले काही दिवस राजकीय क्षेत्रात पाहतो आहोत, सोयाबीनचे भाव पडले, कापसाचे भाव पडले,कांद्यावर निर्यातबंदी घातली गेली. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत,बेरोजगारी वाढली, महापुरुषांचा अपमान केला जातो.महाराष्ट्राचे सत्ताधारी मित्र पक्षाचे एकूण ३९ खासदार आहेत, सर्व सामान्यांच्या प्रश्नावर संसदेत मूग गिळून गप्प बसतात. आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणी भांडत नाही. महापुरुषांचा अवमान करण्यात आला कोणीही बोलत नाही. कोणी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडत नाहीत. त्यामुळं प्रश्न पडतो येणाऱ्या लोकसभेत दिल्लीतून गुबू गुबू वाजल्यावर माना हलवणारे नंदी बैल पाठवायचे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी डरकाळी फोडणारे वाघ पाठवायचे ,हे तुम्ही ठरवा, असं कोल्हे ्हणाले.
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे लढतायत. लोकनेत्यांना वाढदिवसाला गिफ्ट द्याच असतं पण मी मागतोय, लोकनेते यांनी लवकर निर्णय घ्यावा. महाराष्ट्र कधी दिल्लीच्या तख्ता समोर झुकत नाही. दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा असा लोकनेता आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून जर संसेदेत आला. सर्वसामान्यांचा आवाज दिल्लीत घुमेल, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी दक्षिण नगर मध्ये वाजली पाहिजे , असं म्हणत लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed