• Thu. Mar 19th, 2026
    ४२ मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या, स्वतंत्र लढलो तर किमान लोकसभेच्या ६ जागा जिंकू : आंबेडकर

    नागपूर: आम्ही स्वतंत्र लढलो, तर किमान ६ लोकसभेच्या जागा जिंकू शकतो, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथे रवी भवनला झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

    प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही ४२ मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या आहेत. त्यामध्ये आमच्या विचारांचे लोक किती आहेत हे दिसून आले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही सभेत आम्ही जेवण देत नाही, गाड्या देत नाही. मात्र, तरीदेखील सभेला येणारा माणूस स्वतःच्या पैशाने येतो, स्वतःची शिदोरी घेऊन येतो. मात्र तरीही आमच्याकडील गर्दी पाहता स्वतंत्र लढलो तर किमान लोकसभेच्या ६ जागा जिंकू, असा आमचा विश्वास आहे.

    पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही लोकसभेच्या ४८ पैकी सगळ्याच्या सगळ्या जागांवर ताकदीने लढू शकतो. ४८ पैकी २ जागा जर सोडल्या, तर अडीच लाखांच्यावर आमची ताकद असल्याचा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
    ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद, त्यामुळेच जागावाटप झाले नाही, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

    हे सरकार आरएसएसचे आहे. हे भौगोलिक सीमा मानत नाहीत, राष्ट्रीय सीमा मानत नाहीत, तर ते सांस्कृतिक सीमांची चर्चा करतात. तेव्हा, या सांस्कृतीक सीमा विस्तारीत करण्यासाठी भारताला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा डाव चाललाय का? हे इथल्या विचारवंतांनी तपासलं पाहिजे. निवडणुकीपूर्वी लोकांसमोर मांडण्याची आवश्यकता असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले.
    लोकसभा निवडणूक सत्तेवर कोणाला बसवायचे याची नसून आपले अधिकार शाबूत ठेवण्याची लढाई :ॲड. प्रकाश आंबेडकर

    तसेच, बजेटवर बोलताना ते म्हणाले की, आपण या बजेटमध्ये पाहिलं, तर सामाजिक सुधारणेचे कार्यक्रम जे आहेत किंवा सामाजिक कल्याणच्या योजना आहेत त्या कमी करण्यात आलेल्या आहेत. यामुळे दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या माणसाचे आयुष्य हालाखीचे झाले असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed