• Sun. Mar 8th, 2026
    काहीही बोललं तरी चालतंय असं समजू नका, कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही : अजित पवार

    मुंबई : सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण काम करतो. त्या सुसंस्कृत परंपरेला शोभणारी भाषा आपण वापरली पाहिजे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आंदोलनस्थळी गेलेले असताना त्यांच्याशी बोलताना किती शिवराळ भाषा वापरली जाते. मंत्र्यांना शिव्या देणं ही कुठली संस्कृती? काहीही बोललं तरी चालेल असं कुणी समजू नये, असा इशाराच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना दिला.राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून (सोमवार) सुरू होत आहे. अधिवेशाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुरूवातीला देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केल्यानंतर अजित पवार यांनीही अधिवेशनाविषयी अधिकची माहिती दिली. उद्याच्या अधिवेशनात केवळ हंगामी अर्थसंकल्प मांडला जाणार असून पुढील चार महिन्यांचा खर्च मान्य करून घेऊन जुलै महिन्यात अर्थसंकल्प मांडला जाईल, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी महानंदवरून होणारे आरोप तसेच मराठा आरक्षणासंबंधी होणाऱ्या जरांगे पाटलांच्या आंदोलनावर भूमिका स्पष्ट केली.
    मी काही ऐकलंच नाही काय आरोप केलेत, देवेंद्र फडणवीस यांची मनोज जरांगेंच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया

    काही लोक मंत्र्यांना शिव्या देतात, अधिकाऱ्यांशी शिवाराळ भाषेत बोलतात, ही कुठली संस्कृती? काहीही बोललं तरी चालेल असं कुणी समजू नये. लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा प्रत्येकाचा संविधानिक अधिकार पण आंदोलनात केली जाणारे वक्तव्ये ही आपल्या संस्कृतीला शोभणारी आहेत का? मुख्यमंत्र्यांवर देखील शिवराळ भाषेत बोललं जातं, मंत्र्यांना देखील तीच भाषा वापरली जाते ही भाषा योग्य आहे का, याचा मराठा समाजाने विचार करावा, अशा शब्दात अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना खडसावलं.
    जरांगे सागर बंगल्यावर येणार, मग आम्ही गप्प बसणार काय? आम्ही पण मराठे, नितेश राणे यांनी ललकारलं

    आपल्या मुख्यमंत्र्यांनी दसऱ्याला शपथ घेतली आणि मार्ग काढायचा प्रयत्न केला. प्रत्येकाला विरोध करायचा अधिकार आहे, पण आपण काय बोलतो, कोणाला बोलतोय, हे बघण्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले.
    महानंद डेअरीवरून विरोधक अत्यंत धादांत खोटे आरोप करत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांवर हे सरकार अन्याय करतंय, हे ठसविण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. पण त्याला यश येणार नाही, अशा शब्दात महानंदवरून होणाऱ्या आरोपांना अजित पवार यांनी उत्तर दिलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *