• Sat. Sep 21st, 2024
कोकणकरांसाठी महत्वाची बातमी! कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा शनिवारी (दि. २४) एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यापूर्वी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहने सोडण्यात आली होती. मात्र त्यानंतर वाहतूक बंद ठेऊन काम वेगाने सुरू होते. मुंबईतून कोकणात येताना या बोगद्याचा वापर आता करता येणार आहे. मात्र ही वाहतूक सध्या फक्त दिवसा सुरू ठेवण्यात आली आहे.

लवकरच रात्रीच्या वेळेसही हा बोगदा वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. बोगद्यातील दोन्ही बाजूकडील लेन या सुरू होण्यासाठी अंदाजे १५ एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. ही बोगद्यातील सिंगल लेन सुरू झाल्याने कशेडी घाटाचा मोठा अवघड वळसा वाचणार आहे. कोकणातील शिगमोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना कोकणात दाखल होण्याची परवानगी देण्यात आली असली तरी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी कशेडी घाटाचा वापर करावा लागणार आहे.
कधीही छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा घणाघात
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून चाचणी घेऊन अखेर शनिवारपासून मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक ही कशेडी बोगद्यातून वळवण्यात आली आहे. कशेडी बोगदा हा २ किलोमीटर लांबीचा असून या ठिकाणी ४० किलोमीटर प्रति तास एवढी वेग मर्यादा वाहनांनी पाळणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. कोकणातील शिमगोत्सव सणापूर्वी सरकारने कशेडी बोगदा किमान एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्याने कोकणवासियांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

यापूर्वी गणेशोत्सव कालावधीमध्ये बोगद्यातून वाहतूक मुंबईहून गोव्याच्या दिशेने एकेरी सुरू करण्यात आली होती. त्याचप्रकारे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. लहान वाहने प्रति तास ४० किलोमीटर वेगाने या बोगद्यातून रायगडमधून रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होऊ लागली आहेत. लवकरच एसटी आणि खासगी आराम बस यांना देखील बोगद्यातून येण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत असून ती मार्च महिन्यात सरकार पूर्ण करणार का, याची उत्सुकता आहे.

Former Maharashtra CM Manohar Joshi Death : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन

कशेडी बोगद्यामधील अंतर्गत विद्युतीकरणाचे काम अद्याप प्रगतीपथावर आहे. दोन्ही बाजूचे जोड रस्ते पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. १५ एप्रिलपर्यंत ते पूर्ण करून दोन्हीही बोगदे वाहतुकीसाठी खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed