• Mon. Jul 27th, 2026
    Amit Thackeray: आदेश दिल्यास पुणे लोकसभाही लढवू, ‘मनविसे’चे अध्यक्ष अमित ठाकरेंचे सूतोवाच

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पक्षाने आदेश दिल्यास आपण पुणे लोकसभेची निवडणूकही लढवू शकतो,’ असे सुतोवाच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी गुरुवारी दिले. ‘विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय कारकिर्दीतला पहिला गुन्हा अंगावर घेण्याची तयारी आहे. आगामी काळात ‘मनविसे’ प्रत्येक विद्यापीठाची सिनेट निवडणूक लढवण्यासोबतच, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मोर्चे काढण्यासाठी तयार आहे,’ असे ठाकरे यांनी सांगितले.

    अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज, शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधून ‘मनविसे’च्या आगामी वाटचालीची माहिती दिली. या वेळी ‘मनविसे’चे गजानन काळे, प्रशांत कनोजिया, ‘मनसे’चे शहराध्यक्ष साईनाथ बाबर उपस्थित होते.

    पुणे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत पक्षाचे नेते वसंत मोरे आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नावांची चर्चा असल्याबाबत विचारल्यावर ठाकरे म्हणाले, ‘राजसाहेबांनी आदेश दिल्यास पुणे लोकसभेसोबतच राज्यात कोणतीही जागा आपण लढवू. मात्र, स्वत:हून निवडणूक लढवण्याबाबत अजून विचार केला नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

    ठाकरे म्हणाले, ‘दोन पक्षांच्या चार गटांमुळे नागरिकांसोबतच विद्यार्थ्यांचे प्रश्न वाऱ्यावर आहेत. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळेच संघटना मजबूत करण्यात येत असून, कॉलेजांमध्ये युनिटची स्थापना करण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सुत्रे हातात घेऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना चांगले जेवण मिळत नाही. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरेसे वसतिगृह नाहीत. दहा वर्षे झाले, तरी मराठी भाषा भवनाचे काम अपूर्ण आहे, ही शोकांतिका आहे. यामुळे ‘मनविसे’ मैदानात उतरणार आहे. पुणे विद्यापीठापासून त्याची सुरुवात होत आहे. दहा दिवसांत प्रश्न न सुटल्यास, विद्यापीठ प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील,’ असाही इशारा ठाकरे यांनी दिला.

    मिशन लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा, बुलढाण्यातून शुभारंभ; सभेसाठी जय्यत तयारी!

    बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने आजच्या मोर्चाची सुरुवात परीक्षा सुरू झाल्यानंतरच म्हणजे अकरानंतर होणार आहे. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. परीक्षेचा कालावधी लक्षात घेता, शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आमची टीम कार्यरत राहणार आहे.- अमित ठाकरे

    Pune Railway Station:पाण्याच्या दरावरून प्रवाशांची आर्थिक लूट; पुणे रेल्वे स्थानकावरील प्रकार ,रात्रीच्या वेळी रेलनीर ऐवजी इतर ब्रँडच्या बाटल्यांची विक्री
    Navnath Waghmare On Manoj Jarange | जरांगेंचा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना कसली डील? गंभीर आरोप
    Pune News: पासपोर्टसाठी प्रतीक्षा; जुन्या दराच्या सवलतीमुळे अपॉइंटमेंट वेटिंग दोन महिन्यांवर , केंद्र सरकारने दिलेल्या चार दिवसांच्या सवलतीमुळे पासपोर्टच्या अर्जांमध्ये अचानक वाढ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed