Badlapur Terminus: कल्याण ते कर्जत मार्गावर बदलापूर रेल्वे स्थानकावर सर्वाधिक गर्दी असते. यामुळे प्रवाशांसाठी स्थानकाचा विस्तार करणे गरजेचं आहे. या संदर्भात नुकतीच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह बैठकीत चर्चा झाली.
प्रस्तावाल सकारत्मक प्रतिसाद
बदलापूर परिसरातील वाढत्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पालघरचे खासदार आणि बदलापूर महापालिकेचे माजी अध्यक्ष रामभाऊ पाटकर उपस्थित होते. या बैठकीत बदलापूरमधील नागरिकांच्या समस्या मांडण्यात आल्या. यामुळे नागरिकांच्या मागण्या पूर्ण होतील आणि रेल्वे प्रवाशांना लवकरच दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या बैठीक प्रवास सोयीस्कर करण्यासाठी अनेक प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावांना रेल्वे मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून या प्रकल्पांचा अभ्यास करून लवकरच निर्णय घेतले जातील असे या बैठकीत सांगण्यात आले.
Borivali-Gorai Ferry: बोरिवली ते गोराई नव्या जेट्टीमुळे प्रवास 15 मिनिटांत, पण बांधकामाचा प्रवाशांना फटका; अरुंद मार्गामुळे गर्दीत वाढ
सध्या 80 कोटींची कामे सुरू
बदलापूर स्थानकादरम्यान सध्या बरीच विकासकामे हाती घेतली आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या मार्गावर 36 स्थानकांवर कामे सुरू आहेत. यामध्ये फलाटांचं रुंदीकरण सुरू आहे. यानंतर धीम्या व जलद मार्गावर 15 डब्यांच्या लोकल सुरू करण्यात येणार आहेत. हे काम बदलापूर स्थानकावरही सुरू आहे. याशिवाय दोन नवे 12 मीटर रुंद रेल्वे पूल मुख्य आणि छोटे फलाट जोडणारा 150 मीटर लांब डेक आणि आणखी एका 12 मीटर पुलाचं काम सुरू आहे. या कामांसाठी 80 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
कसा होणार विकास?
या बैठकीत काही महत्त्वाच्या मागण्या केल्या गेल्या होत्या. सर्वात महत्त्वपूर्ण प्रस्तावात बदलापूर रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्यात यावा याची मागणी करण्यात आली. या प्रस्तावाला अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना याबद्दल सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान एक नवं चामटोली रेल्वे स्थानक सुरू करण्याचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला. यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकावरील गर्दी विभागली जाण्यास मदत होईल. यासह कासगाव आणि कामोठे दरम्यानही एका नव्या रेल्वे मार्गाची मागणी करण्यात आली. रेल्वे मंत्र्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना स्थानकांवर आणि परिसरात पाहणी करून या प्रकल्पांची व्यवहार्यता तपासून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
Pune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची प्रतीक्षा संपेनाच, डिसेंबर, मार्चची ‘डेडलाइन’ हुकली; आता जुलै महिना उजाडणार
दरम्यान, या बैठकीत टिटवाळ्यापुढे नवीन गुरवली रेल्वे स्थानक आणि बदलापूर-पुणे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू करण्याचीही मागणी केली. रेल्वे मंत्र्यांनी बहुतेक मागण्यांची तपासणी करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
