• Sat. Sep 21st, 2024
निवडणुकीत जनता ४० गद्दारांना घरी बसल्याशिवाय राहणार नाही – आदित्य ठाकरे

निलेश पाटील
जळगाव: महाराष्ट्रातून गुजरातमधून वेदांत फॉक्सन हा मोठा प्रकल्प आता परदेशात गेला असल्याने देशाचे मोठे नुकसान झाले असल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना सभेदरम्यान बोलत होते. महानिष्ठ महान्याय महाराष्ट्र या दौऱ्यादरम्यान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज जळगाव लोकसभेच्या दौऱ्यावर होते. त्यांचे आज जळगाव शिरसोली कासोदा आणि भडगाव चारही विधानसभा क्षेत्रात दौरे असून या ठिकाणी सभा घेण्यात आल्या आहे. यात जळगाव येथे साडेअकरा वाजेची वेळ असताना तब्बल तीन तास उशिराने जळगाव येथील सभा सुरू झाली.

सभेदरम्यान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, दोन वर्षात महाराष्ट्रात वेदांत हा मोठा प्रकल्प पूर्ण होणार होता. मात्र शिंदे सरकार आल्यानंतर हा प्रकल्प गुजरात येथे हलवण्यात आला. तेथील प्रकल्प मालकाला विचारले असता गुजरातमध्ये हा प्रकल्प करायला सुमारे आठ ते दहा वर्षे लागतील. कारण या ठिकाणी वीज व रस्त्यांची सुविधा नसल्याने या ठिकाणी वेळ लागेल. हाच प्रकल्प जर महाराष्ट्रात असता तर दोन वर्षात पूर्ण होऊन एक लाख तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध झाला असल्याचे ही ठाकरे यांनी सांगितले. मात्र आता वेदांतसारखा मोठा प्रकल्प गुजरातमधून देखील परदेशात गेला असल्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, तसेच सध्या सरकारच्या काळात पेपर फुटीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. २०० मार्कांचा पेपर असतो. मात्र २१४ मार्क विद्यार्थ्याला पडतात. जे पेपर फोडण्याचे काम करतात त्यांना पोलीस अटक करतात. मात्र नंतर दोन महिन्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होते. जेव्हा विद्यार्थी खरोखर अभ्यास करतात आणि तेव्हा त्यांना कळते की पेपर फुटला. त्यावर त्यांच्यावर किती दुःखाची वेळ असते. आज सर्वांना या ठिकाणी वचन देतो २०२४ मध्ये आपले सरकार येणार आहे. ज्या दिवशी सरकार येईल त्याच दिवसाला पेपर फुटी प्रकरणी दहा पटीने जास्त कायदा केल्याशिवाय राहणार नाही, असे वचन यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले.

सध्या या सरकारमध्ये गद्दार मंत्र्यांकडून फक्त बदल्या केल्या जात आहे. महिलांवर अत्याचार वाटण्याचे प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. जे गद्दार मंत्री आहे त्यांच्याकडून महिला संदर्भात काय अपेक्षा ठेवायची? कारण ज्यांनी महिलांवर अत्याचार केला तेच या मंत्रिमंडळात समाविष्ट असल्याचे सांगितले. जो बलात्कार करेल त्याला तात्काळ फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे. हा कायदा आपल्याकडे नाही, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, डिझेल पेट्रोल शेतकऱ्यांचे खत देखील महाग झाले आहे. निवडणुकीत जनता या ४० गद्दारांना घरी बसल्याशिवाय राहणार नाही. सध्या महाराष्ट्रात जाती-जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवण्याचे आहे आपलं हिंदुत्व चूल पेटवण्याचे, असल्याचे देखील ठाकरे यांनी सांगत सरकारवर निशाणा साधला आहे.

Asha Worker Protest : कुपोषित बालकांची सेवा करतो तरी सरकारला कदर नाही; आशा सेविकेनं धक्कादायक अनुभव सांगितला

आदित्य ठाकरे म्हणाले, अश्रूधूर सोडून रामराज्य येणार नाही. शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करतात आणि रामराज्य येणार म्हणतात. आता राम मंदिर झाले. आपण देखील २०१८ मध्ये राम मंदिर व्हावे, ही मागणी केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे सुद्धा अयोध्येला गेले असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed