• Sat. Sep 21st, 2024

तोरणमाळमध्ये भीषण अपघात! प्रवासी वाहन पलटल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

तोरणमाळमध्ये भीषण अपघात! प्रवासी वाहन पलटल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

नंदुरबार: जिल्ह्यातील तोरणमाळ येथे प्रवासी वाहनाचा अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या अपघातात दोन जण गंभीर जखमी आहेत. या अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांचं हिंदुत्व घर पेटवण्याचं मात्र आपलं हिंदुत्व चूल पेटवण्याचं, आदित्य ठाकरेंची सरकारवर जोरदार टीकामिळालेल्या माहितीनुसार, मॉगोरंबा गावापासून लेगापाणी या गावाकडे हे वाहन जात होते. यावेळी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने तीव्र उतारावरून गाडी ही खोल दरीत कोसळली. यामुळे हा मोठा अपघात झाला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी बांबूची झोळी करत मृतदेह बाहेर काढले आहेत. स्थानिकांच्या मदतीने चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जखमींना तातडीने म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.

मी एकटा मुंबईत जाऊन बसेन, सलाईन लावायच्या आधी अंमलबजावणी कधी करता सांगा : मनोज जरांगे

म्हसावद पोलीस ठाणे हद्दीमध्ये गोरंबा लेगापाणी घाटात महिंद्रा मॅक्स हे वाहन मांडवी गोरंबा मार्गे जात असताना घाटातील वळण रस्त्यावर आणि तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे वाहन दरीत कोसळले. त्यात इसम दारासिंग कुवरसिंग चौधरी (४१), धीरसिंग पुण्या पाडवी (३५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर साबलीबाई दारासिंग चौधरी (३८), कांतीलाल जेठ्या वसावे (३०) यांचं मसावद ग्रामीण रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान सुनील दारासिंग चौधरी (चालक ) आणि गोविंद उपसिंग वळवी हे जखमी असून त्यांच्यावर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. म्हसावद पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

म. टा. प्रतिनिधी यांच्याविषयी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed