• Sat. Sep 21st, 2024
आधी बिहारमध्ये भाजपचा CM बसविणार आणि नंतरच खासदारकीचा विचार : विनोद तावडे

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुढील वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवणुकीला प्राधान्य दिले आहे. या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री करणे, हे उद्दिष्ट आहे. त्यानंतरच आपण खासदारकीचा विचार करू, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी नवी दिल्लीत बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवारीबाबत तावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

तावडे यांनी जागतिक पुस्तक मेळाव्यात पुणे पुस्तक महोत्सवाच्या दालनाला भेट दिली. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

तावडे म्हणाले की, राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली की, काही ठराविक उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा सुरू होते. पक्षाने यंदाच मला उत्तर मुंबईची लोकसभेची जागा लढवण्याबाबत सांगितले होते. मात्र, खासदार झाल्यानंतर जबाबदारी वाढते आणि संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने कमी वेळ मिळतो. सध्या पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने अधिक वेळ द्यायचा आहे. पुढील वर्षी बिहार विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर, खासदारकीचा विचार करू, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
छान घडतंय, वेगळ्या गोष्टी आठवण्याची गरज नाही; मेधा कुलकर्णींच्या नाराजीवर राज्यसभेची फुंकर

भारतीय जनता पक्षाने सर्व विचार करून, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहे. या उमेदवारीमध्ये समतोल राखला असल्याची प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed