काही दिवसांपूर्वी वसंतला मला दिल्लीला पहायचं आहे, असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटले होते. पण शर्मिला ठाकरे साईनाथ बाबर यांच्या कार्यक्रमांमध्ये साईनाथ दिल्लीला गेला तर दुधात साखर पडेल अशा प्रकारचं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर वसंत मोरेंनी सूचक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं आहे.
“कुणासाठी किती बी करा राव, वेळ आली की फणा काढतातच, पण मी बी पट्टीचा गारुडी आहे, योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार” असं वसंत मोरे यांनी लिहिलं आहे. नेमकं आता हे स्टेटस त्यांनी कोणासाठी ठेवलं आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे आणि विद्यमान शहराध्यक्ष साईनाथ बाबर या दोघांनीही पुणे लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी पक्ष नेतृत्वाकडे गळ घातली होती. वसंत मोरे यांनी तर शहरभर बॅनरबाजी करत आपणच मनसेचे लोकसभेचे उमेदवार होण्यासाठी उत्सुक असल्याचे उघड आणि ठामपणे सांगितले होते. तर दुसरीकडे मनसेचे साईनाथ बाबर यांनी देखील आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते.
राज ठाकरे यांनी पुणे लोकसभेचे प्रभारी म्हणून सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्या अनुषंगाने अमित ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. त्याचा अहवाल राज ठाकरे यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News