• Sun. Mar 15th, 2026

    राईनपाडा हत्याकांड प्रकरणाची सहा वर्षांनंतर सुनावणी; ७ आरोपींना जन्मठेप, वाचा नेमकं प्रकरण…

    राईनपाडा हत्याकांड प्रकरणाची सहा वर्षांनंतर सुनावणी; ७ आरोपींना जन्मठेप, वाचा नेमकं प्रकरण…

    धुळे: संपूर्ण राज्य हादरवून सोडणाऱ्या राईनपाडा हत्याकांडाचा अखेर आज निकाल लागला. पाच भिक्षुकांच्या हत्याप्रकरणी धुळे न्यायालयाने ७ जणांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती एत्त.ए.एम. ख्वाजा यांनी आरोपींना शिक्षा सुनावली आहे. ह्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते.
    नागपुरात चाललंय काय? शहरात हत्येची मालिका सुरुच, वर्चस्वाच्या लढाईतून मित्राला संपवलं
    मिळालेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे जमावाने मुलं पकडणारी टोळी समजून भारत शंकर भोसले, भरत मावळे, दादाराव भोसले, आगनुक इंगोले, राजू भोसले या गोसावी डावरे समाजातील भिक्षुकांची हत्या केली होती. हे हत्याकांड १ जुलै २०१८ रोजी राईनपाडा ग्रामपंचायत कार्यालयात घडले होते. दरम्यान, या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. कौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या घटनेचा जलद निकाल लागण्याचे आश्वासन तेव्हा सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र, निकालासाठी तब्बल ६ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. अखेरीस सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली.

    पेढे बनवताना आईचे केस भाजले, डोळ्यांसमोरच्या घटनेने आयुष्य पालटलं, ‘खत्री बंधू’ आईस्क्रीम ब्रँड बनला

    जन्मठेप सुनावलेल्या आरोपीमध्ये महारू ओंकार पवार, दशरथ दसन्या पिंपळसे, हिरालाल ढवळ्या गवळी, गुलाब रामा पाडवी, युवराज मणू बौरे, मोतीलाल काशिनाथ साबळे यांचा समावेश आहे. धुळे जिल्हा दंडाधिकारी क्र. १ चे न्यायमूर्ती एस.ए. एम. ख्वाजा यांच्या समोर खटल्याचे कामकाज चालले. यात विशेष सरकारी उज्वल निकम, जिल्हा सरकारी देवेंद्रसिंह तंवर, अ. सरकारी वकील निलेश कलाल यांनी विशेष भूमिका निभावली. तर तपासाधिकारी तत्कालीन डीवायएसपी श्रीकांत घुमरे यांची साक्ष महत्वाची ठरली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed